साईमत, जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञा आणि आशीर्वादाने तसेच प.पू.दादासाहेब चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंतीनिमित्त रविवारी, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘श्रमदानातून स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. दिंडोरी प्रणित मार्गाच्या ‘श्रमदानातून स्वच्छता अभियान’ मोहिमेच्या माध्यमातून रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राद्वारे मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाटातील जवळपास ५० सेवेकऱ्यांच्या सहकार्याने तलाव किनाऱ्यावरील जलपर्णी आणि काठावरील निर्माल्याचे संकलन करण्यात आले. त्यातून सुमारे २ ट्रॅक्टर इतका जलपर्णी आणि कचरा संकलन करण्यात आला.