सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे

0
28

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व असे सर्व आबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे. म्हणून निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही. निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य, नवा आनंद होय. सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन परिवाराला वेळ द्यावा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.ओ.माळी यांनी केले. ते पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या माध्यमातून सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करतांना बोलत होते.

व्यासपीठावर अहिराणी साहित्य गोकुळ बागुल, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार, साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक बी.एस.जाधव होते. ओबीसी शिक्षक असोसिएशनच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांना विचारपीठावरील मान्यवर व ओबीसी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ बुके देऊन सत्कार केला. इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मनोहर भिंडेच्या वादग्रस्त विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच निसर्ग कवी ना.धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षेचे केंद्र संचालक विजयसिंह पवार, अहिराणी साहित्य गोकुळ बागुल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, तालुकाध्यक्ष सोपान भवरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन.आर. चौधरी, संघटक मनोहर पाटील, कोषाध्यक्ष आर.आर.सोनवणे, सदस्य पक्षीमित्र अश्विन पाटील, मुनाफ तडवी, एस.के.महाजन, मार्गदर्शक एन.ए.साळुंखे, हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार, समता शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष अजय भामरे, प्रहार प्राथमिक शिक्षक संघटनेचे सुधीर चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार ओबीसी शिक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष डी.ए.सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here