Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»‘म्हणून २०२१ मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला
    क्रीडा

    ‘म्हणून २०२१ मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला

    SaimatBy SaimatAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, दुबई ः वृत्तसंस्था

    एकदिवसीय विश्वचषक २०११ नंतर प्रथमच भारत विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याव्ोळीही भारत घरच्या मैदानावर विश्वविजेता होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो की, भारताच्या कामगिरीचे प्रमुख कारण देशातील मीडिया आहे, जे संघावर दबाव आणते. याच दबावामुळे २०२१ साली भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.

    शोएब अख्तरने रेज स्पोर्ट्‌सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतीय मीडिया आपल्या खेळाडूंची काळजी करत नाही. ते त्यांच्यावर खूप दबाव टाकतात जे चुकीचे आहे. रावळिंपडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू म्हणाला, मी मीडियाच्या लोकांना सांगू इच्छितो की, थोडा विचार करा. इतका दबाव कोण निर्माण करतो? हा दबाव कसा निर्माण होतो हे मला माहीत आहे पण ते अत्यंत चुकीचे आहे.‌’

    पाकिस्तानला होतो फायदा
    यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकाची आठवण करून देताना शोएब अख्तर म्हणाला, ‌‘मी दुबईत पाहिले. मी तिथे भारताच्या स्थानिक वाहिनीशी बोलत होतो. त्यांनी टीम इंडियाच्या रंगात सर्व काही रंगवले. टीम इंडिया पाकिस्तानला हरव्ोल एवढेच ते सांगत होते. जेव्हा तुम्ही आम्हाला अंडरडॉग बनवता, तेव्हा आमच्यावरील दबाव संपतो. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते म्हणून आम्ही गेलो आणि सामना िंजकला. हे नेहमीच असेच राहिले आहे.”

    विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली झाली नाही. २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्‌‍सने पराभव झाला होता. गतवर्षी त्यांनी पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला असला. तरी भारताला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. २०१९ मध्येही भारताचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला होता. उपांत्य फेरीत त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Indian cricketer : “रिंकू सिंहच्या रीलमुळे वादग्रस्त संघर्ष! देवतांचे चित्रण पोलीस तक्रारीत”

    January 19, 2026

    Cricket : बॅट हातातच होती… अन् जीवनाची इनिंग संपली

    January 9, 2026

    Hardik Pandya : हार्दिक पंड्या झंझावाती! विजय हजारे स्पर्धेत १३३ धावांचे धडाकेबंद शतक

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.