Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»Bhusawal : अस्थी विसर्जनाऐवजी स्मृतीचे वृक्ष ; शिंदे परिवाराने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
    भुसावळ

    Bhusawal : अस्थी विसर्जनाऐवजी स्मृतीचे वृक्ष ; शिंदे परिवाराने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

    SaimatBy SaimatNovember 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत प्रतिनिधी

    परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी आणि रक्षा विसर्जन करण्याऐवजी भडगाव तालुक्यातील शिंदे परिवाराने फळझाडे लावून स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांची स्मृती जपली, आणि समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श ठेवला.

    भाजपाचे कार्यकर्ते भगवान शिंदे यांचे बंधू व सागर शिंदे यांचे वडील स्वर्गीय नारायण बाजीराव शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सागर शिंदे, त्यांची पत्नी सोनल, भगिनी सोनाली जितेंद्र पाटील, मोनाली किरण पाटील, रूपाली कुणेश बोरसे तसेच संपूर्ण शिंदे परिवाराने ठरविले की अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जित न करता, त्यांच्या स्मृती म्हणून फळझाडे लावावीत.

    “अस्थी विसर्जनाने नदी प्रदूषित होते, त्यामुळे त्याऐवजी वृक्षारोपणाचा मार्ग निवडला,” असे शिंदे कुटुंबियांनी सांगितले. स्वर्गीय नारायण शिंदे हे स्वतः निसर्गप्रेमी आणि वृक्षसंवर्धन करणारे होते. त्यांच्या या विचारांचे जतन करण्यासाठी कुटुंबियांनी ‘स्मृतीचे वृक्ष’ लावून त्यांची आठवण जिवंत ठेवली.

    या उपक्रमाला पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) व टीम हिरवांकुर चे नाना पाटील सर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांनी शिंदे परिवारास सांगितले की पारंपारिक पद्धतीने अस्थी विसर्जन केल्यास नदी प्रदूषण वाढते आणि जलचर पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे अशा पर्यायी उपक्रमांद्वारेच खरे पर्यावरण रक्षण साध्य होऊ शकते.

    या वेळी जावई जितेंद्र पाटील (शिरपूर) यांनी सांगितले की, “प्रत्येकाने आपल्या प्रियजनांच्या स्मृतीत एक झाड लावले, तर ती स्मृती फुलांच्या रूपात कायम राहील आणि निसर्गालाही दिलासा मिळेल. समाजाने ही पद्धत स्वीकारावी, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

    कार्यक्रमावेळी माजी सैनिक उत्तमराव भिका पाटील (तांदुळवाडी) व आनंदा पाटील (सामनेरकर) उपस्थित होते. त्यांनी अशा उपक्रमांचे गावागावात आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.

    नाना पाटील सर यांनी या अभिनव प्रयोगाचे कौतुक करत म्हटले, “शिंदे परिवाराने फक्त आपल्या प्रियजनांची स्मृती जपली नाही, तर जलप्रदूषण रोखून समाजालाही नवा संदेश दिला आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरणप्रेमाची नवी संस्कृती निर्माण होईल.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    भुसावळच्या राजकारणात पोकळी; माजी आमदार निळकंठ फालक काळाच्या पडद्याआड

    December 26, 2025

    Bhusawal : भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले

    December 23, 2025

    Bhusawal : सांगवी खुर्द जि.प.प्राथमिक शाळेस नानासाहेब खोले यांची भेट

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.