शालेय मित्र-मैत्रिणी २७ वर्षानंतर सहपरिवार आले एकत्र

0
35

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा’ या ओळींची आठवण करून देणारे अमळनेर येथील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील हे बालपणी शिकत असलेल्या नूतन माध्यमिक विद्यालय व आताच्या कै.शांताबाई भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय वाळकी, शेंदुणी, मालखेडा, ता.चोपडा शाळेच्या १९८९ ते १९९६ पर्यंत सोबत शिकलेल्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणींचे एक अनोखे गेट-टुगेदर शिरपूर तालुक्यातील अनेर डॅम, गोरक्षनाथ मंदिर आणि नागेश्वर मंदिर येथे उत्साहात नुकतेच झाले. २७ वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रिणी सहपरिवार एकत्र आले. व्हाट्‌‍सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जमलेली सर्व मंडळी प्रत्यक्ष भेटली. भेटून प्रत्येकाला आनंद झाला. नागेश्वर मंदिरावर भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकांच्या परिवाराचा परिचय देत सर्व मित्र-मैत्रींणींनी बालपणीच्या खोड्या, दंगा-मस्ती केलेल्या आठवणींना उजाळा दिला.

त्यात शेखर पाटील, मनोहर पाटील, गजानन पाटील, सुनील धनगर, धिरज पाटील, दगडू पाटील, कैलास पाटील, श्रीराम धिवर, मुक्तीलाल मिस्तरी, सतीश राजपूत, समाधान रायसिंग, पूनमचंद, नंदलाल पाकळे, संभाजी, महारू वडर या मित्रांनी सुरुची भोजनाची व्यवस्था केली. जळगावहून बाळू पाटील, सरवडहून उद्योजक असलेले प्रभाकर पाटील, सुरतहून विनायक साळुंखे, बोराजंटीहून राजू धनगर, कुरवेलहून रेखा कोळी, चिमठाणेहून ज्योती राजपूत, महाळपूरहून गुंजन पाटील, योगिता रायसिंग आदी मित्र- मैत्रींनी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शरद पाटील तर शेखर पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here