साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात तैली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅली ने शहरातील नागरिकांचे मन मोहीत केले. या रॅलीत समाज बांधवांचा उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि संतांच्या विचारांचे स्मरण पाहण्यासारखे होते. सामाजिक ऐक्याचा संदेश देत रॅलीचे वातावरण ओजस्वी झाले.
रॅली मार्ग व कार्यक्रमाची सुरुवात
रॅलीची सुरुवात तरुण कुढापा चौक, नेरी नाका येथून ढोल-ताशांच्या गजरात झाली. समाजातील युवक, महिला आणि कार्यकर्ते मोटारसायकलवर एकत्र निघाले. रॅली पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक आणि एस.टी. वर्कशॉप मार्गे पुढे सरकत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे एकत्रित झाली. रॅली मार्गावरील नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला व सामाजिक ऐक्याचा संदेश दृढ केला.
मान्यवर आणि सहभाग
या उपक्रमात शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्तिथ मान्यवर :
बेबाबाई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी यांनी उत्साहाने रॅलीत सहभाग नोंदवला.बबन चौधरी, रामचंद्र चौधरी, संदिप चौधरी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, विशाल दिगंबर पाटील, विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी, योगराज चौधरी, सतिश चौधरी, शिवाजी चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी, हरेश्वर चौधरी, चेतन चौधरी, स्वप्नील चौधरी, पंकज चौधरी, आशिष चौधरी, मंगेश चौधरी, मयुर चौधरी, बापू चौधरी, शरद चौधरी, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, निखिल चौधरी, रविंद्र तायडे, सुभाष चिंधू चौधरी, विलास चौधरी, दिलीप चौधरी, मनोज बापू चौधरी, दुर्गेश चौधरी, धनंजय चौधरी, अविनाश चौधरी, प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, कन्हैया चौधरी, हेमंत पाटील, मनोज आप्पा चौधरी, बाळू भाऊ चौधरी, दपाडू चौधरी, प्रसाद चौधरी, प्रकाश ओंकार चौधरी, विजय चौधरी, अॅड. चंद्रकांत चौधरी, तुषार पाटील, विक्की चौधरी, संजय चौधरी, हरीश तेली, लक्ष्मण चौधरी, गणेश चौधरी, भूषण चौधरी, हर्षल चौधरी, रोहित चौधरी, निलेश चौधरी, रत्नाकर चौधरी यांसह मोठ्या संख्येने पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक संदेश
रॅलीत सहभागी सर्वांनी एकत्र येऊन संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांचा प्रसार केला आणि समाजातील एकात्मता, भाईचारा आणि सामाजिक सहकार्य याचा संदेश दिला. ढोल-ताशांचा गजर, मोटारसायकलच्या आवाजात उत्साह, तरुणाईचा जोश आणि नागरिकांचा सहभाग हे सर्व या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
हा उपक्रम संतांचे स्मरण, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक उर्जा या तिन्ही बाबींवर ठसा उमठवणारा ठरला, ज्यामुळे शहरवासीयांनी उत्साहाने स्वागत केले.
