Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»स्वातंत्र्यदिनी संभाजी भिडे राज्यात काढणार भगवा रॅली
    राज्य

    स्वातंत्र्यदिनी संभाजी भिडे राज्यात काढणार भगवा रॅली

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती ः प्रतिनिधी

    शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वातंत्र्य दिनी राज्यात भगवा रॅली काढणार आहे.या रॅलीला आता जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडेंना अटक करा, अशी मागणी केली आहे.
    पत्रकारांशी रविवारी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही.स्वातंत्र्यदिनी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करणे गरजेचे आहे.
    भिडेंवर टीकेची झोड
    महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेस भिडेंविरोधात आक्रमक झाला आहे. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. महात्मा गांधींंचे पणतू तुषार गांधी यांनी भिडेंविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले आहे. तुषार गांधी यांनी आरोप केला आहे की, संभाजी भिडेंचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर दुसरे
    बोलतात.
    भिडे म्हणाले आहेत की, १५ ऑगस्ट या दिवशी भारताची फाळणी झाली त्यामुळे १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस असूच शकत नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली असल्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याऐवजी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा.
    दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.