पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागल्याने आनंद
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ.साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात ५१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निकालातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश निलेश पाटील (८२ टक्के), मनीष सचिन पाटील (८१.५०), सचिन समाधान पाटील (८०.३३), यशोदीप रमेश पाटील (७९.८३), प्रांजल दीपक पाटील (७९.६७) यांचा समावेश आहे. आमडदे येथील विज्ञान शाखेने पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने घवघवीत यश संपादन केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा ९२.६० टक्के निकाल लागला आहे. त्यात ८१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी त्यात ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यात प्रथम क्रमांकाच्या पाच विद्यार्थ्यांमध्ये सुरेंद्र शितल पाटील (७२.८३ टक्के), साक्षी गौतम मोरे (७२.५०), प्रतिक्षा विनोद जैन (७२.५०), अर्चना विजय वंजारी (७०.८३), सचिन अशोक हटकर (६९.५०), पल्लवी देवचंद वंजारी (६९.३३) यांचा समावेश आहे.
यांनी केले कौतुक
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत पाटील, प्राचार्य आर.आर.वळखंडे, पर्यवेक्षक बी.एन.पाटील तसेच मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.