आर्मी स्कूलमध्ये अहिराणी भाषेतून जनजागृती

0
38

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजयनाना पाटील ज्युनिअर कॉलेज येथे अहिराणी कवी, लोकगीतकार बापूराव सोनवणे यांनी आपल्या अहिराणी कविता व गीतांच्या माध्यमातून विविध विषयावर जनजागृती केली. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.

बापूराव यांनी ‘हागणदारी मुक्त गाव पाहिजे’, ‘शिकाना कटाया करू नका’, ‘पाणी आडवा..पाणी जिरवा’, ‘झाडे लावा..झाडे जगवा’, ‘रोगराई थांबवा’ आदी विषयावर विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर व्ही. डी.पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here