‘Samaj Chintamani’ Award : कवी गोविंद देवरे ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने सन्मानित

0
11

प्रतिष्ठाने साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून घेतली कार्याची दखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील कांचन नगरातील रहिवासी, कवी तथा लेखक गोविंद देवरे यांना भगीरथ इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन समाज चिंतामणी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आर.डी.कोळी, कवी जयसिंग वाघ, पूर्व शिक्षा अधिकारी नीलकंठ गायकवाड, डी.बी.महाजन, भास्कर चव्हाण, श्री.बडगुजर यांच्यासह समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

साहित्य विकास मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष गोविंद देवरे सुरुवातीला काही काळ अण्णाभाऊ साठे यांच्या सान्निध्यात राहिले होते. जळगावच्या साहित्यिक आंदोलनात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. तसेच महाकवी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर साहित्यिक, कवी, लेखकांसह अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here