साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
नदीकाठी वनभिंत तयार होवो आणि भविष्यातील पुरांपासून आपले संरक्षण व्हावे, हा नदीकाठचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार व्हावा म्हणून शहरातील दत्तवाडी पूल, तिरंगा पूल ते गुरुवर्य नगर या भागात मिशन वृक्षलागवड अंतर्गत बांबू आणि इतर अशी सुमारे ११२ वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्षलागवड मिशन पाच पाटील टीम, नगरपालिका प्रशासन, सामाजिक संस्था, दानशूर उद्योगपती, नदीकाठावरील सजग नागरिक, कॉलनी, महिला संघटना आणि लोकसहभागातून करण्यात आली.
यावेळी मिशन पाचशे कोटीचे डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, उद्योजक नारायणदास अग्रवाल, प्रदीप देशमुख, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, चाळीसगाव निरीक्षक सचिन निकम, सेवानिवृत्त सैनिक, किमयाग्रुपचे अप्पासाहेब (जितेंद्र), नागरिक तसेच मिशन ५०० भालेराव, प्रा. आर. एम. पाटील, शालीग्राम निकम, कोमल जाधव, आबा कच्छवा, दिलीप सावंत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत भालेराव, तुषार महाजन, देवेंद्र पाटील, भालचंद्र क्रिकेट क्लब, शिवेनरी क्रिकेट क्लब शेखर निंबाळकर आदी उपस्थित होते.
नंदकुमार वाळेकर, नगरपालिकेचे उद्यान दाभाडे, जिजाई महिला मंडळ, सुप्रभात लोकसहभागातून ही वृक्षलागवड झाडे जगवा, झाडे वाचवा. जबाबदारी पुढाकार घेणाऱ्या सजग नागरिकांनी ९८५००८२००६. ९४२२९७३५७४ संघटनेचे आबासाहेब व त्यांचे यांच्यासह पाच पाटील सविता राजपूत, ठिबक सिंचनासाठी खर्च शासनाकडून मिशन ५०० च्या कोणाही पाच पाटलांना या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
वृक्षांची ‘किमया’ ग्रुपने घेतली जबाबदारी
नदीकाठी वनभिंत उभी रहावी, यासाठी डोर्फ केटल केमिकल प्रा.लि. च्यावतीने बाबूंचे रोपे उपलब्ध करून देण्यात आली. वृक्षलागवडीसाठी स्व.दादासाहेब गोविंदराव भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ किमया ग्रुपचे अप्पासाहेब भालेराव यांनी वड, चिंच, शिवण, लिंब आदी वृक्ष व त्या वृक्षांसाठी जाळ्या, नेमप्लेट उपलब्ध करून दिले. त्या झाडांसाठी ठिबक व जगविण्याची जबाबदारी ‘किमया’ ग्रुपने घेतली. बांबू वृक्षाच्या लागवडीसाठी ठिबकची सोय सितामाई नगर येथील सेवानिवृत्त प्रा. व्ही. जी. पाटील हे उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.