Indian Democracy : भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज : मुकुंद सपकाळे

0
7

संविधान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत व्यक्त केले मत

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

भारतीय जनमानसात लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली आहे. धर्मांधतेला पोषक वातावरण राजसत्तेकडून निर्माण होत असताना भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा संविधान संमेलनाचे निमंत्रक मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या संविधान संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त पद्मालय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुकुंद नन्नवरे होते. बैठकीत धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांना फोनवरून आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला.

बैठकीत संविधान संमेलनाच्या अनुषंगाने डॉ. मिलिंद बागुल यांनी भूमिका मांडली. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनात वैचारिक परिसंवाद,चर्चासत्र आयोजित करण्यात येण्यासंदर्भात विचार मांडले. मुकुंद नन्नवरे यांनी संविधान संमेलन देशहितासाठी आहे. पुढच्या पिढीसाठी लोकशाहीचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. बैठकीत बापुराव पानपाटील, सचिन बिऱ्हाडे, उदय सपकाळे, आधार सपकाळे, राम पवार, जगदीश सपकाळे, भीमराव अडकमोल, प्रा. के. एल. हिरोळे, चेतन नन्नवरे, सुभाष सपकाळे, वाल्मिक जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीत यांनीही मांडल्या सूचना

बैठकीत विजयकुमार मौर्य, गोपाळ भालेराव, दत्तू सोनवणे, धर्मरत्न मोरे, महेंद्र केदारे, सोमा भालेराव, संजय सोनवणे, अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, आय.एस. वाघ, सुभाष साळुंखे, जयपाल धुरंधर, यशवंत घोडेस्वार, राजू सपकाळे, आनंदा तायडे, भारत सोनवणे, संतोष गायकवाड, अजय बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, व्ही.आर, भारुडे, कादर अली सैय्यद यांनी सूचना मांडल्या. सूत्रसंचालन प्रीतीलाल पवार तर जगदीश सपकाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here