घरी आलेल्या युवकांनी एकटक बघताच सासू अन्‌‍‍ सून बेशुद्ध ; भरदुपारी भामटे दागिने घेऊन पसार

0
34

नागपूर :

‘संकट आले आहे’, असे सांगून सासू-सुनेला बेशुद्ध करून दोन भामट्यांनी त्यांच्याकडील दागिने पळविले. ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील धम्मदीपनगर येथे घडली. याप्रकरणी वर्षा किरण बोरकर (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वर्षा आणि त्यांच्या सासू पुष्पा (वय ४२) या शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघीच घरी होत्या. एक युवक त्याच्या घरासमोर आला. …मी जामसावळी येथून पालखीसाठी आलो आहे, दान द्या’, असे तो म्हणाला. पुष्पा या त्याला दहा रुपये देण्यासाठी गेल्या असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पुष्पा यांनी त्याला प्यायला पाणी दिले. ..तुमच्या मागे …बला'(संकटं) लागली आहे’, असे म्हणत त्याने आपल्या मित्रालाही तेथे बोलावले. संकट टाळण्यासाठी त्याने लालरंगाचा धागा पुष्पा यांच्या हाताला बांधला. त्यानंतर दोघांनी पुष्पा व त्यांच्या सुनेकडे एकटक बघितले. काही वेळातच दोघीही बेशुद्ध झाल्या.

या दरम्यान, भामट्यांनी पुष्पा यांच्या गळ्यातील आठ हजार रुपये किमतीची सोनसाखळी काढली व दोघेही पसार झाले.काही वेळाने नातेवाइक घरी आले असता त्याला दोघीही बेशुद्ध दिसल्या. त्याने पाणी शिंपडले असता दोघी जागी झाल्या. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून भामट्यांचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here