साईमत जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील १८ पगड जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार ठरलेल्या मायबाप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालयात १९९१ च्या तृतीय वर्षाच्या बॅचमधील लेकरांचा गोतावळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला.
यावेळी तत्कालीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर 1991 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख,यांच्यासह प्रा.व्ही.एस.सोनवणे, प्रा. एस.जे.जाधव,उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील, डॉ.के. बी.पाटील, प्रा.डॉ.बी.के.सोनवणे, प्रा.डॉ.पांडुरंग (राजू सर) पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.अशोक पांडव, संजय चौधरी, प्रसन्न मांडे, सुनील लाठी, आबासाहेब पाटील,विजय देसाई, उमेश पाटील, आर जी पाटील यांनी गुरुजनांचा सन्मान केला. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सध्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल एडवोकेट अजय तल्हार, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील,पत्रकार चुडामण बोरसे, माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा, वीज वितरण कंपनीतील संजय डोंगरदे, संजय कुलकर्णी (अंकलेश्वर), सचिन बोरसे, सुहास चव्हाण, दिनेश बडगुजर, उषा चौधरी, मनीषा जगताप – शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैशाली डोहोळे- रावेरकर यांनी तर आभार प्रा.पांडुरंग पाटील यांनी मानले.