ओझरला तमायचे युवा फाउंडेशनच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांचे प्रतिपादन
ओझर, ता.जुन्नर/जळगाव :
आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला-मुलींना नोकरी नाही. उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले-मुली भटकू नये, आजारी असलेल्यांची अवस्था वाईट होऊ नये, सगळ्या लोकांना मदत व्हावी. तसेच राज्यभरातील तमायचे संघातील लोकांना सशक्त व समृद्ध करून महिलांना सशक्तीकरण करून तळागाळातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट यांनी केले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र विघ्नहर ओझर येथे विमुक्त कंजारभाट समाजातील तमायचे परिवार युवा फाउंडेशनची सामाजिक सशक्तीकरण व प्रबोधन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अष्टविनायक विघ्नहर गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट, नंदुरबारचे राकेश तमायचे, अंबरनाथचे विनोद तमायचे, जळगावचे नरेश बागडे, शशिकांत बागडे, जुन्नर तालुक्याचे सरपंच कुलदीप तमायचे, धीरज तमायचे, कांतीलाल तमायचे, मनोजबाबा माछरे, नरेश बागडे, संजय मोती, विजय बागडे, शशिकांत बागडे, राकेश तमायचे, गणेश बागडे, रवी तमायचे, करण तमायचे यांच्यासह जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, ठाणे, पुणे, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तमायचे युवा फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
तमायचे युवा फाउंडेशनच्या कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयराज भाट (कोल्हापूर), उपाध्यक्ष युवराज तमायचे (नारायणगाव), महासचिव विनोद तमायचे (अंबरनाथ, ठाणे) खजिनदार विशाल तमायचे (विघ्नहर ओझर,) कार्याध्यक्ष राकेश तमायचे (नंदुरबार), सहसचिव शशिकांत बागडे (जळगाव), मुख्य सल्लागार कुलदीप तमायचे, कार्यालय सचिव विक्की तमायचे (पिंपरी, पुणे) सदस्यांमध्ये विजय बागडे (जळगाव), अजय उर्फ टोनी बागडे, रवी तमायचे (पुणे), मनोज तमायचे, करण तमायचे (दोंडाईचा) विशाल तमायचे अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा निवडीत समावेश आहे.
तमायचे परिवाराला समृद्ध करण्याचा फाउंडेशनचा उद्देश
राज्यभरातील तमायचे परिवाराला सशक्त व समृद्ध करणे हाच फाउंडेशन स्थापनेचा उद्देश आहे. तसेच महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार, सामूहिक विवाह सोहळा करणे असल्याचे विनोद तमायचे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यशस्वीतेसाठी कुलदीप तमायचे, युवराज तामचीकर, विशाल तमायचे, बबलू तमायचे, लाखन तमायचे, नितीन तमायचे, गोविंदा तमायचे, अतीष तमायचे, सचिन तमायचे, बेराज तमायचे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल तमायचे तर आभार युवराज तमायचे यांनी मानले.