Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Dog ​​Attack In Jalgaon : जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या ‘बॉबीला’ न्याय द्या
    जळगाव

    Dog ​​Attack In Jalgaon : जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या ‘बॉबीला’ न्याय द्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 9, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी केली मागणी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड ह्या चार वर्षीय बाळाचा गेल्या १ जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मयताच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीसाठी सोमवारी, ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॉबीला न्याय मिळालाच पाहिजे, असे म्हणत आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मोकाट कुत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या.

    नागेश्वर कॉलनीतील अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या बालकाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. नागेश्वर कॉलनी व परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याबाबत येथील रहिवाशांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे मोर्चा, निवेदन देऊन त्यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु, गेंड्याच्या कातडीच्या महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा एक लहान मुलगा बळी ठरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व एकत्र येऊन त्याचा निषेध व्यक्त करुन जनआक्रोश केला आहे. या घंटनेनंतर शासनाच्या कोणताही अधिकाऱ्याने गायकवाड कुटुंबाची भेट घेतली नाही किंवा त्यांचे सांत्वन केले नाही. तसेच त्यांना अद्यापही कोणतीही शासनाकडून मिळालेली नसल्याचे अनिल अडकमोल यांनी सांगितले.

    रामानंद नगर पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करु, असे सांगितले होते. परंतु, घटनेला ९ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई याठिकाणी झालेली दिसून येत नाही. मनपानेही अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मोकाट कुत्र्यांनी शहरात विविध उपनगरातील जवळपास २५० नागरिकांना चावा घेतला आहे.

    पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी

    पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थिती म्हणून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, उपनगरातील पिसाळलेले कुत्रे, मोकाट कुत्रे यांच्यावर मनपाने तातडीने कारवाई करावी, मनपाने कुत्रे निर्बिजीकरण करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. यासोबतच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि मनपा आरोग्य अधिकारी उदय वाघ यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhanora, Chopda Taluka:वाचन हे स्पर्धा परीक्षेचे आधार कार्ड” – खुशबू महाजन यांचा संदेश

    January 1, 2026

    Jalgaon:विद्यापीठातील दोन अधिकारी सेवेतून निवृत्त

    January 1, 2026

    Jalgaon:१५ जानेवारी जळगाव निवडणूक: मतदान हक्कासाठी भरपगारी सुट्टी बंधनकारक

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.