Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, मानसिंग नाईक लवकरच अजित पवार गटात
    मुंबई

    जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, मानसिंग नाईक लवकरच अजित पवार गटात

    SaimatBy SaimatAugust 5, 2023Updated:August 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई, प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी खिंडार पाडल्याने राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले होते. पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा जबर हादरा लवकरच बसणार आहे. शरद पवारांच्या जटातीले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे आणि मानसिंग नाईक हे अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे समजते.

    शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत घेण्यास तत्कालीन भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर फुली मारली होती. आता तोच प्रकार कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत घडल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनीच आव्हाड यांच्या प्रवेशाला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांच्यासोबतच्या ‌‘लॉट‌’मध्ये त्यांचा समावेश झाला नाही. अन्यथा जितेंद्र आव्हाड देखील अतित पवार गोटात येण्यासाठी घुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. जयंत पाटील यांच्यासोबत शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक व सुनील भुसारा हेही अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चार आमदारांचा प्रवेश झाल्यास आव्हाड यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहित पवार हे तीनच आमदार मूळ राष्ट्रवादीमध्ये राहतील, अशी शक्यता आहे. पक्षातील सर्वच नेते अजित पवार गटात गेल्यास रोहित पवार हे देखील शरद पवारांची साथ सोडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

    जलसिंचन खाते जयंत पाटलांसाठीच राखीव
    शिंदे सरकारने खाते वाटप केली असली तरी जलसिंचन खाते अद्याप राखीव आहे. ते कोणालाच दिलेले नाही. ते जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव असून त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास जयंत पाटील पुन्हा जलसिंचन मंत्री झाल्यास आश्चर्य वाटायला नको? अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Mumbai : “महिलांचे राज्य! महाराष्ट्रातील १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर

    January 22, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.