Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगावला अवकाळीचा तडाखा; वादळी पावसासह गारपीटीचा ‘ऑरेंज अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली
    जळगाव

    Jalgaon : जळगावला अवकाळीचा तडाखा; वादळी पावसासह गारपीटीचा ‘ऑरेंज अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    saimatBy saimatMarch 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगाव / प्रतिनिधी

    राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर त्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला असून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे.

    हवामान विभागाने १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    गेल्या आठवड्यात ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना अचानक हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३६ अंशांवर आले आहे.

    दरम्यान, या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापणी केलेल्या पिकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकरी धावपळ करत आहेत, तर शेतात उभ्या पिकांबाबत चिंता वाढली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Jalgaon:जळगाव भगवेमय हिंदू नववर्ष स्वागत यात्रा भक्तिपूर्ण रंगात रंगली

    March 19, 2026

    Jalgaon Murder : जळगावात कौटुंबिक वादाचा अंतःस्थळ: पत्नीची लोखंडी विळ्याने निर्घृण हत्या

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.