साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
बाळद बु. येथील रहिवासी सुरेंद्र विनायक सोमवंशी यांनी १७ वर्षे अखंड देशसेवा करून भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी अरुण सोमवंशी, प्रकाश मोरे यांच्यासह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तसेच भडगावला शेख रऊफ दगडू मणियार हे इंडियन आर्मीमधून १७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
याप्रसंगी गणेश परदेशी, योजना पाटील, माधव पाटील, जे.के.पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर पाचोरा येथे सेवापूर्ती समारंभात अनिल शालिक पाटील यांनी २२ वर्षे इंडियन आर्मीत आपला कार्यकाळ पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले. याबद्दल वैशाली सूर्यवंशी यांनीही त्यांचा गौरव करुन कौतुक केले. याप्रसंगी नरेंद्रसिंग सूर्यवंशी, पप्पू राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.