मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यातच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात शिवसेना नेमकी कुणाची असा वाद सुरु आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यातच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी याच मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
शिवसेना कुणाचा पक्ष आहे , हा वाद सध्या न्यायालयात सुरु आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते . बिनकामाचे आहेत, म्हणून ज्याला जे चिन्ह शोभेल, तसे त्या माणसाला मिळायला हवं. पण आता ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ते स्वतःच म्हणतायत आता सगळे बाण निघून गेले. हे फक्त रिकाम टेकडे धनुष्य घेऊन बसलेत. त्यांना ते चिन्ह शोभणारं नाही. या चिन्हासाठी कुणीतरी रफटफ माणूस पाहिजे. जसे बाळासाहेब होते. त्यांना शोभायचं ते चिन्ह. यांना कुठलं तरी देऊन टाका लॉलीपॉप वगैरे. ते शोभेल, धनुष्यबाण शोभणारं नाही.
निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरही भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी फुटलेला पेपर सोडवला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कौशल्याच्या जोरावर काही प्रश्न विचारले आणि ठाकरेंनी त्यांची थेट उत्तरं दिली, असे काही नाही. प्रश्नही आधीच माहित होते आणि त्याचे उत्तरही त्यांना माहिती होते, असे राणे म्हणाले.