Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त, दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे होणार
    मुंबई

    राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त, दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे होणार

    SaimatBy SaimatJuly 21, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

    कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून लसीकरणही मोठ्या वेगाने सुरू आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे इच्छा असतानाही हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. पण यंदाच्या वर्षी सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षी असलेल्या मर्यादा हे लक्षात घेऊन गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात साजरे व्हायला हवेत. याच संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि कायदा-सुव्यवस्था राखून शांततेत हे उत्सव साजरे झाले पाहिजेत यासाठी सर्व पोलीस, जिल्हा प्रशासनांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

    गणेशोत्सव मंजळांना नोंदणी शुल्कात सूट

    गणेशोत्सव आणि दहीहंडीसह इतर उत्सव सुरळीत पार पडायला हवेत यासाठी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. यासोबतच मंंडपाची परवानगी प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंडपाच्या संदर्भात कुठलेही शुल्क न घेण्याचेही आम्ही सांगितले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    गणेश मूर्तीवर कुठलीही मर्यादा नाही

    मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, गणेश मूर्तीवर मर्यादा होती ती मर्यादा यंदाच्या वर्षी काढून टाकण्यात आली आहे.

    दहीहंडी उत्सव साजरा करताना नियम पाळा

    दहीहंडी उत्सव साजरा करताना सर्व नियम पाळले पाहिजेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या नियमांचं पालन व्हायला हवं.

     

    युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी

    मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वेगाने रस्त्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णयही घेतला आहे.

    #mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.