Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»३ लाख शेतकऱ्यांकरीता २१० कोटी ३० लाखांचा निधी वितरित
    अमळनेर

    ३ लाख शेतकऱ्यांकरीता २१० कोटी ३० लाखांचा निधी वितरित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    ईकेवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरीता मदतीचा २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरीता त्यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मागील पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५००.०० रुपये कोटी इतका निधी बाधित शेतकऱ्यांकरीता मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डिबीटी प्रणालीमार्फत निधीचे वितरण सुरु आहे. मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी निधी वितरणाबाबत आढावा घेतला.

    हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवारपर्यंत आणखी २,५०,००० शेतकऱ्यांकरीता १७८.२५ रुपये कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरीता तातडीने मदत मिळावी, यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ईकेवायसी करण्याचे मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ही सेवा निशुल्क असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    शासन शेतकऱ्यांसाठी सजग

    डिबीटी प्रणालीत काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीही तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांप्रती सजग आहे. शेतकऱ्यांकरीता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ईकेवायसी करून घेण्याच्या सूचनाही सर्व तहसील आणि जिल्हा यंत्रणांना दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : श्रीमंत प्रताप शेठ यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालयात अभिवादन

    December 13, 2025

    ‘Sudden Drinking Water Reservation’ : जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर

    December 6, 2025

    Government Extends : ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.