Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट: ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, विझणार कधीच अंगार नाही’
    मुंबई

    गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट: ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, विझणार कधीच अंगार नाही’

    SaimatBy SaimatJuly 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुबंई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह

    गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी ट्विट करत आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली नाहीच, हिंदुत्वाशिवाय आपला विचार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदेंनी लगावला आहे.
    शिंदेंनी वेळ साधली

    ठाण्यात एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या सोबत रहात समाजकाऱ्यास सुरुवात केली होती. दिघेंनी एकनाथ शिंदेंना राजकारण शिकवले असे म्हटले तर गैर ठरणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आता ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन केले आहे. सध्या खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू असताना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत वेळ साधली आहे्.

    बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.

    विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….

    गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk

    — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022

    आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदेंसह जवळपास 40 शिवसेना आमदारांनी बंड केले होते. यानंतर राज्यात 13 दिवस राजकीय नाट्य सुरू होते. यामध्ये बंडखोर आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली होती, त्यांनतर मात्र अनअपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. भाजपने आम्ही एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे सांगतांना हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे ,असेही म्हटले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम

    December 21, 2025

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.