नाल्याला पाणी आल्याने गावाचा तुटतो संपर्क, ग्रामस्थांसह अनेकांचे हाल

0
68

येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे.

साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे. नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यावर गावातील व धानोरासह परिसरातील नागरिकांच्या गावाशी संपर्कप्रमुख तुटतो. विशेष म्हणजे याच पुलावरून जि.प.शाळा व माध्यमिक शाळा जाण्याकरता वापर केला आहे. मात्र,याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यावर आणि वरतून पावसाची रिप्रेप सुरू असल्यावर इकडून प्रवेश करता येत नाही या पालक आल्यावर फरशी फुल बसवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

२५ हजार लोक वस्तीचे गाव असलेल्या आणि तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या धानोरा गावात पालक आल्यावर फरशी पूल बसवण्याची मागणी पुढे येत असून गावातील यांना पाणी आल्यावर पूर्णपणे गावाचा व बाहेर खेडेगावावरून येणाऱ्या लोकांचा संपर्क तुटून जातो याच नाल्याच्या बाजूला गुरुवारी गावाचा बाजार भरत असून धानोरासह परिसरातील १४ खेडे लोकांचे गावातील लोक याठिकाणी बाजार करण्यासाठी येत असतात.

त्यामुळे बाजारात प्रवेश करताना महिला भगिनींना व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास करावा लागत आहे. याच पुलावरून जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच माध्यमिक शाळा आणि चोपडा आणि जळगाव या ठिकाणी उच्च शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापर असल्यामुळे पावसाळ्यात नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. त्यामुळे नाल्यातून प्रवेश करणे फार मोठे कठीण होऊन बसते. त्यामुळे याठिकाणी नवीन फरशी फुल मंजूर करावा, अशी मागणी धानोरासह परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here