Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»लाचार व स्वाभिमान हे शब्द तुमच्या तोंडून शोभतात का?
    मुंबई

    लाचार व स्वाभिमान हे शब्द तुमच्या तोंडून शोभतात का?

    saimatBy saimatSeptember 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ः प्रतिनिधी

    दिड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. तेव्हापासून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे व टोलेबाजीचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक चालू आहे.या बैठकीवरून शिंदे गटाच मंत्री दीपक केसरकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे तसेच त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला आहे.

    काय म्हणाले होते केसरकर?

    इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत सध्या ठाकरे गट बसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपक केसरकरांनी टीका केली होती. “बाळासाहेबांच्या मुंबईत चालू असलेली लाचारी आम्हाला मान्य नाही.सध्या जे चालू आहे ती लाचारी तुम्हाला मान्य आहे का? हा आमचा सवाल आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.

    दरम्यान, दीपक केसरकरांच्या टीकेवर पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. “केसरकर म्हणतायत हा महाराष्ट्र आम्ही लाचार होऊ देणार नाही. पण लाचार व स्वाभिमान हे शब्द आपल्या तोंडून शोभतात का हो? आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही असे म्हणत तुम्ही इथून गेलात.अजित पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या गाडीमागे तुम्ही पळत सुटलेले दिसलात. त्याला लाचारी म्हणतात की, स्वाभिमान म्हणतात हे तुम्ही एकदा सांगितले पाहिजे. ते शुक शुक केल्यावर पळतात तसे पळत होतात तुम्ही गाडीच्या मागे. तेव्हा केसरकर तुम्हाला कसं वाटलं बरं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Mumbai : महापालिका निवडणूक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण; गट एकत्र येण्याची शक्यता

    January 17, 2026

    Mumbai : ४६ पैकी ४६”चा पराक्रम आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांची शाबासकी,

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.