मलकापुरला अस्मानी चक्रीवादळामुळे एकाचा मृत्यू

0
17

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

तालुक्यात अस्मानी चक्रीवादळामुळे अनेकांना चक्रीवादळाचा सामना करावा लागला तर यामध्ये भीमनगर येथील रहिवासी रवींद्र निकम हे महादेवाच्या मंदिरात पावसामुळे बसले असता मंदिरावरील घुमट डोक्यात पडून मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाले तर झाडे उन्मळून पडले आहे. तसेच समर्पण लोन येथील लग्नप्रसंगी काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांच्या अंगावर भिंत कोसळल्याने एक महिलेचा हात तुटला तर तीन महिला जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. तसेच समर्थ लॉनवरील तीन सेट उडाले आहे.

भीमनगर येथील मोलमजुरी करणाऱ्या रवींद्र विश्राम निकम (वय ५५) हे महादेवाच्या मंदिरात चक्रीवादळ आणि पावसामुळे आसरा घेण्यासाठी मंदिरात बसले होते. तेव्हा मंदिरावरील घुमट त्यांच्या डोक्यावर पडला. ही घटना घडल्यानंतर त्यांना ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी दवाखान्यामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रवींद्र निकम यांचा मृत्यू झाला.

येथील मूकबधिर विद्यालयातील निवासस्थानी निंबाचे आठ ते दहा झाडे उन्मळून पडले आहे. अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विजेचे तार तुटले तर खांब तुटून पडले आहे. त्यामुळे गोरगरिबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बुलढाणा रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने ट्राफिक जाम झाली होती. तसेच दाताळा जवळील टोल नाक्यावरील तीन पत्रे उडाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चक्रीवादळामुळे रात्रीपासून वीज खंडित झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here