Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»कागदी लिंबाची लागवड करा, १२ वर्ष लाखोंचा नफा मिळवा
    कृषी

    कागदी लिंबाची लागवड करा, १२ वर्ष लाखोंचा नफा मिळवा

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लिंबाचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. त्यात व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने, डॉक्टर देखील त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळं लिंबाचा वापर (लिंबू लागवड) वाढला आहे. उन्हाळ्यात तर त्याचे भाव गगनाला भिडतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की अनेक शेतकरी याच्या लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. त्यामुळं कागदी लिंबाची लागवड करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
    अलीकडच्या काळाज कागदी लिंबाच्या लागवडीत वाढ होत आहे. कागदी लिंबाचे एक रोप सुमारे २०० रुपयांना मिळते. विशेष म्हणजे हे लिंबाचे एक झाड सलग १२ वर्षे फळ देते. एवढेच नाही तर लिंबाच्या या जातीमध्ये सामान्यपेक्षा जास्त फळे आहेत. एका झाडाला ३ हजार ते ५ हजार लिंबे येतात. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कागदी लिंबाच्या २०० ते ३०० रोपांची लागवड केली आहे. ज्यामध्ये सुरुवातीला उत्पादन कमी होते. पण हळूहळू उत्पादन वाढत जाते. त्यानंतर शेतकरी लिंबू लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवू शकतात.
    लिंंबाची लागवड केल्यानंतर सुरुवातीला त्याची योग्य काळजी घ्यावी. कारण चांगली काळजी घेतल्यावर उत्पादनही चांगले होऊ शकते. त्यामुळं शेतकरी वर्षातून तीन वेळा पीक घेतात. यामध्ये एकावेळी १५ हजार ते २० हजार लिंबू सहज काढता येतात. घाऊक बाजारात एक लिंबू किमान तीन रुपयांना विकले जाते. नुकसान टाळण्यासाठी कीटक आणि रोगांकडे लक्ष द्या. लिंबू पिकावर अनेक प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे. जे वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसू शकतो. त्यामुळं लिंबाला योग्य वेळी खत-पाणी देणं गरजेचं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Sudden Drinking Water Reservation’ : जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर

    December 6, 2025

    Government Extends : ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ

    December 1, 2025

    Agricultural produce market ; यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दिल्या दप्तर तपासणीच्या नोटीस

    November 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.