Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»पवारवाडी ते अनिल नगरपर्यंत काँक्रिटीकरण रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे
    चाळीसगाव

    पवारवाडी ते अनिल नगरपर्यंत काँक्रिटीकरण रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :

    शहरातील प्रभाग १० मधील हंस चित्र मंदिराकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने काँक्रिटीकरण रस्त्याचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र, थोटे रस्ता होत असताना कामावर येत नसल्याने कामाची गुणवत्ता ठेकेदारामार्फत राखली जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आ.मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता बैसाने यांना सूचना करून उच्च दर्जाचे काम करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी प्रभागातील नागरिक करत आहेत.

    काँक्रिटीकरणाचे काम करत असताना त्यात सिमेंट गज वाळू ज्या पद्धतीने वापरली पाहिजे त्या पद्धतीने न वापरता कमी प्रतीचे मटेरियल वापरले जात आहे. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांच्याकडे असताना कामावर ते साधे फिरकत नाही. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता संबंधित ठेकेदार राखत नसल्यामुळे लाखो रुपयांचा निधी हा पाण्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर आळे करून पाणी भरणे गरजेचे आहे. मात्र, त्यावर साधे बारदान टाकले जात नाही. पाणी मारले जात नसल्यामुळे ह्या रस्ता किती काळ टिकेल, ही शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

    रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजणार

    यासंदर्भात रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री.बैसाणे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष करत शाखा अभियंता रावसाहेब थोटे यांचीच बाजू घेतली. त्यामुळे रस्त्याचे ‘तीन तेरा’ वाजल्याशिवाय राहणार नसल्याचा सूर आता प्रभागातील नागरिकांमध्ये उमटू लागला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026

    Chalisgaon:कारवरील नियंत्रण सुटले आणि होत्याचे नव्हते झाले; कन्नड घाटात भीषण अपघात

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.