भारतीय संविधानाचे महत्त्व पिढीपर्यंत पोहोचवण्यावर भर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रतिमा आणि बोधचिन्हाला आदिम इतिहास आहे. ती समूहाची अस्मिता आहे. तसेच चित्रकाराला दृष्टी, डोळसपणा, बुद्धी व कल्पकता आवश्यक आहे. त्यासाठी व्यासंग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त तथा चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले.अभियंता भवनात आयोजित संविधान सन्मान संमेलनाच्या बोधचिन्हाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संयोजक मुकुंद सपकाळे होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय लोकशाहीला संविधानाने जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून दिली आहे. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी संविधानाचे रक्षण करणे असल्याचे अध्यक्षीय मनोगताता मुकुंद सपकाळे यांनी अधोरेखित केले. विचार मंचावर संजय इंगळे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, समीक्षक…
Author: Sharad Bhalerao
भाषा धोरणाचा विसर नको : शासनाच्या निर्णयानुसार इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद देण्याची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही शासकीय कार्यालयांमधील इंग्रजी पत्रव्यवहारामुळे सामान्य कामगार व नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात आवाज उठविला आहे. विविध कंपन्या व कारखान्यांमधील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील तक्रारीवर दिलेले उत्तर इंग्रजी भाषेत असल्यामुळे मनसेने शासन निर्णयानुसार ते मराठीत देण्याची लेखी मागणी केली आहे. निवेदनामुळे कामगार वर्गाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. शासन कार्यालयांनी भाषा धोरणाची अंमलबजावणी कितपत गांभीर्याने घेतली आहे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आपल्या कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते. त्यावर प्राप्त झालेले…
पूर्वजांनी कष्टाने निर्माण केलेल्या वास्तू विक्रीत धन्यता मानणारी नवी पिढी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सध्या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आणि तमाम शेतकऱ्यांमध्ये जळगावमधील नवीपेठ येथील ‘दगडी बँके’ची वास्तू विक्रीचा विषय खूप चर्चेचा विषय बनला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्हाव्यापी संस्थेची सत्तासूत्रे ज्या मंडळींच्या हातात आहे, ती मंडळी पूर्वजांनी अतिशय कष्टाने दूरदृष्टीपणाने ज्या संस्था व वास्तू उभ्या केल्या त्यांनी चालविण्याचे कोणते प्रयत्न करीत आहेत…? असा प्रश्न उपस्थित करून दगडी बँकेची वास्तू विक्री करून ही मंडळी काय साध्य करू इच्छितात…? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये जोरदारपणे उपस्थित केला जात आहे. दगडी बँकेची वास्तू हा सहकाराचा वारसा (हेरिटेज) असल्याचे बहुसंख्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे किंबहुना अशा…
साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कुसुंबा गावात जुन्या वादातून एका कुरिअर व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, चंद्रशेखर त्र्यंबक पाटील (वय-५५, रा. गणपती नगर, कुसुंबा) हे त्यांची पत्नी आणि मुलगे करण व स्वराज यांच्यासह वास्तव्यास आहेत. चंद्रशेखर पाटील यांचा मुलगा करण याचा किरण खर्चे नावाच्या व्यक्तीसोबत मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच जुन्या भांडणाच्या कारणावरून हा हल्ला केला. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबीय जेवण…
जळगावातील बालाजीपेठेत घडली घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या एका कारागीराने ज्वेलरीमधून सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोने लुटले. ही घटना शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स येथे उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बिस्वजीत बनेस्वर सासमल (सोने कारागीर, ह.मु. रिधुरवाडा, मूळ रा. वार्ड नं. १० जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ३ लाख ७२ हजार किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचा एक तुकडा, ५ लाख १८ हजार किमतीचे अंदाजे ४७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख ९८ हजार किमतीचे अंदाजे २७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची…
जळगावात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला भामट्यांनी लावला चुना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कोणताही ओटीपी न कळविता अथवा लिंकला क्लिक करताही एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची ३ लाख ६६ हजार ८९३ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. पाच वेळा ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून परस्पर ट्रान्सफर झाली. हा प्रकार गेल्या २९ सप्टेंबर रोजी घडला. दरम्यान, याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही लिंक क्लिक न करता अथवा ओटीपी न देताही रक्कम लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मांगीलाल बनवारीलाल पारिक (वय ६५, रा. नेहरूनगर) यांचा ट्रान्सपोर्ट नगरात पूजा रोड कॅरियर नावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे खासगी बँकेत खाते आहे. गेल्या २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या…
सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक गौरव साईमत/जामनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे यावल प्रकल्पात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त ‘अमृतयात्री’ डी. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सुनंदा दिगंबर पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते. व्यासपीठावर प्रकल्प अध्यक्ष एडी माळी, उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव ए.बी. कोंगे, कार्याध्यक्ष एस. एच. चौधरी, व्ही. एन. पाटील, डी. व्ही. चौधरी आदी उपस्थित होते. यावल प्रकल्पात डी. डी. पाटील हे २७ वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अत्यंत कडक शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांसह…
चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. नितीन विसपुते यांच्या लिखित पुस्तकाचे प्रकाशन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाजसेवक, पद्मश्री तथा मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्तीवर बोलू काही’ पुस्तकाचा भव्य लोकार्पण सोहळा मंगळवारी, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी हेमलकसा येथे पार पडणार आहे. हे पुस्तक जळगावातील परिचित चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते लिखित आहे. समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर आणि त्यावर मात करण्याच्या उपाययोजनांवर आधारित आहे. समाजाच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त असे पुस्तक आत्ममंथन आणि प्रेरणा दोन्हीचा संगम घडवते.याप्रसंगी डॉ. नितीन विसपुते यांच्यासोबत चेतना विसपुते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनीषा महाजन, ज्ञानवेध अबॅकसचे संचालक संदीप सोनार, लता सोनार, आदित्य कॉम्प्युटरचे…
‘सुधर्मा ज्ञानसभा’ संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘सुधर्मा ज्ञानसभा’ संस्थेचा २३वा वर्धापन दिन यावर्षी सातपुडा वनक्षेत्रातील शेवरे बुद्रुक छोट्याशा आदिवासी बहुल गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हा वर्धापन दिन नवीन गावात, शालेय विद्यार्थ्यांसोबत शालेय साहित्य वाटप करत तसेच निष्काम कर्म सेवा करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करत साजरा करण्याची सुधर्माची अनोखी परंपरा आहे. यंदा शेवरे बुद्रुक गावाची निवड केली होती. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला चोपडाचे शिक्षण विस्ताराधिकारी अजित पाटील, राजमल महाजन, चंद्रशेखर साळुंखे, राजेश आडवाल, सुधीर चौधरी, धानोराचे केंद्रप्रमुख राकेश पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय…
एकता फाउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंह यांच्या जयंतीनिमित्त एकता फाउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे जळगावातील कायदेतज्ञ, गो-सेवाव्रती तथा पर्यावरण मित्र ॲड. विजय सूरजमल काबरा यांना ‘डॉ. मनमोहन सिंह राष्ट्रीय गौरव पुरस्काराने’ नुकतेच सन्मानित करण्यात आले. गेल्या २००९ पासून ॲड. विजय काबरा “सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान” मोहिमेअंतर्गत राज्यातील हजारो लोकांनी देशी गो-मातांची सेवा करत आहे. तसेच मागील काळात ३७ तृतीयपंथीयांनीही गो-सेवा केली.जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, वकील, डॉक्टर्स, सनदी लेखापाल, इंजिनिअर, शिक्षक व सर्व व्यवसायिकांनी गो-सेवा केली. प्रामुख्याने दै.‘तरूण भारत’ आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दरवर्षी गो-सेवा करण्यात येते. जळगाव शहरातील रोजी-रोटीसाठी झगडणाऱ्या रिक्षा चालक व मालक हिंदू,…