Author: saimat team

कजगाव ता भडगाव, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या घुसर्डी ता भडगाव येथील भूमिपुत्र व पोलीस दलात कार्यरत असलेले प्रविण उत्तमराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक ह्या पदावर पदोन्नती झाली आहे. घुसर्डी सारख्या अगदी छोट्याश्या खेड्यातून त्यांनी कठोर मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक पदावर मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांनी यापुर्वी चाळीसगाव शेगाव औरंगाबाद भुसावळ नाशिक येथे सेवा बजावली आहे व आता पदोन्नतीवर त्यांची नियुक्ती अकोला येथे झाली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ते माजी मुख्याध्यापक उत्तमराव शिंद यांचे सुपुत्र तर विलास व अनमोल शिंदे यांचे बंधू आहेत

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका दुकानाचे मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एका दुकानाचे गोडावून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गंगाराम चौधरी (वय ३४, रा. दत्त मंदीरजवळ खडके चाळ, शिवाजी नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सपना हॉटेलच्या पाठीमागे एक गोडावून भाड्याने…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. त्यानंतर आता संजय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. जळगाव शिरसोली अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एस.बी. सनस (उप स्टेशन प्रबंधक, जळगव) यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे समजते. २ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रंगाने सावळा, अंगाने मध्यम असलेल्या या तरुणाची दाढी बारीक वाढलेली असून तो…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी जेष्ठ नागरिक आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे व जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठीकीच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष सुरेश सोनार यांनी केले. तसेच जळगाव महानगराच्या ९ मंडलाची रचना विशद केली. जेष्ठ नागरिक आघाडीच्या माध्यमातून जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिक बंधू-बघिनिना विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यामध्ये सहकार्य, मदत करून समाजाची सेवा करण्याची रचना करण्यात आली. जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक तसेच विविध शासकीय,…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता मिळू शकतो. निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सन 2001 नुसार, डिसेंबर 2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो शकतो. सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3 टक्के अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता एकूण महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला.…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अकृषिक स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित टीडीएस नियमही अर्थसंकल्पात बदलण्यात आले. नवीन नियमानुसार, आता 50 लाख रुपयांपेक्षा जास्त अकृषिक मालमत्तेच्या व्यवहारावरील विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा जे जास्त असेल त्यावर, 1 टक्के टीडीएस भरवा लागणार आहे. म्हणजेच आता घर खरेदी करणाऱ्यांचे खिसे मोकळे होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून लागू आता नव्या नियमानुसार यासाठी प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. हा बदल यावर्षी 1 एप्रिलपासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल. कर चोरी थांबेल मालमत्ता व्यवहारातील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभुमिजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागुन श्रीकृष्ण नगरातील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक असे की, शहरातील श्रीकृष्ण नगरात सागर अरूण सरोदे वय 30, हा आपल्या आई वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास आहे. दोन्ही भाऊ शहरातील महात्मा गांधी मार्केट परीसरात भाजीपाला विक्री करून आपल्या कु टुंबाचा उदरनिर्वाह करतात. सागर सरोदे हा आज पहाटेच्या सुमारास घरात काही न सांगता निघुन गेला होता. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेचा जवळ धक्का लागुन तो गंभीर जखमी झाल्ाा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 4 ते 30 मार्च लेखी परीक्षा होणार असून 14 फेबु्रवारी…

Read More