Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी येथील सेवा स्पंदन आयोजित अलंकार ऑनलाईन फोटो स्पर्धेत अश्‍विनी तांबट (पुणे) यांनी प्रथम तर अश्‍विनी कुळकर्णी (औरंगाबाद) हिने द्वितीय आणि कल्याणी देशमुख (नाशिक) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त करीत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. १८ ते ६० वर्षे आणि ६० वर्ष व त्यावरील अशा दोन गटांचे परिक्षण स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले, झी युवा वाहिनीच्या एक्झकेटिव्ह प्रोड्युसर ऋतुजा जोशी यांनी केले. दुसर्‍या गटात कुमुदिनी पाटील (पाचोरा), निलीमा चित्रे (बदलापूर), रेखा कुळकर्णी (जळगाव) आदिंनी परितोषिकांचा गौरव प्राप्त केला. सर्वाधिक वयाच्या स्पर्धक प्रमिला येवले (वय ८०, जळगाव),स्व.रजनी दलाल(मरणोत्तर,पाचोरा),संध्या कौल (विशेष अलंकार,जळगाव)…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात मध्यरात्री मवाली,गुंड प्रवृत्तीचे भुरटे चोर रस्त्यावर धावणार्‍या ट्रक चालकाशी जबरदस्ती कुरापत काढून मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून ट्रक चालकांना लुबाडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याबाबत जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी काल पीडित वाहनचालक यांना कार्यालयात बोलावून प्रत्यक्ष हकीकत जाणून घेतली व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्‍वासन दिले. एखाद्या निवेदनावर उच्च दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांनी अशी बैठक आपल्या कार्यालयात घेतली याबाबत असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसह ट्रकचालकांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान वाहनचालकांनी त्यांच्यासोबत झालेल्या लूटमारांविषयी सविस्तर माहितीही दिली. गेल्या काही दिवसांत जळगाव शहराच्या हद्दीत वाहनचालकांकडून लुटल्याच्या घटना समोर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नवीन शिक्षण नीती धोरणात योग विषयाचा समावेश, शालांत तसेच उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रमुख विषयामध्ये योगास स्थान देणे, महाविद्यालयात योग विषय अनिवार्य करणे, मनपा तसेच जिल्हा परिषद शाळेत योग विषयाचा समावेश, युजीसी मान्यताप्राप्त अस्थापना मधून प्रशिक्षित योग शिक्षकांना प्राधान्य देणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि महापौर भारतीताई सोनवणे यांना देण्यात आले. अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या जळगाव शाखेचा नुकताच शुभारंभ झाला. त्यानंतर महासंघाच्या वतीने योग शास्त्राच्या प्रचाराची मोहीम सुरू केलेली आहे. गुरूमुखातून प्रकट ज्ञानाला पुन्हा शिक्षणाचा दर्जा देण्यासाठी योग महासंघाच्यावतीने जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धोरणकर्त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शेतकरी हा संपूर्ण देशवासीयांचा पोशिंदा व अन्नदाता आहे. कृषी क्षेत्र हा आपला पाठीचा कणा आहे.असे असतांनासुद्धा केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहे. हे कायदे मुळातच देशभरातील शेतकर्‍यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्‍वासात न घेता हे विधेयके मंजूर केली आहे. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणार्‍या शेतकर्‍यांना हद्दपार करतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोडतोड करून भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची कृती सुरू आहे. कोरडवाहू आणि आर्थिक दृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकर्‍यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल. म्हणून यासंदर्भातील तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी…

Read More

डॉ. शीतल आमटे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत एक महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरातील फार्मासिस्टच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. नागपूर: महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शीतल आमटे यांनी कुत्र्यांसाठी मागवलेले इंजेक्शन वापरून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दिशेने आता पोलीस तपास करण्यात येत आहे. समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी ३० नोव्हेंबरला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली होती. आनंदवनात ही…

Read More

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला (BJP) मोठा फटका बसला आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड (Arun Lad) यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर (Nagpur) पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस (Congress) व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri) विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद…

Read More

आजपासून टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे, परंतु पॅट कमिन्स (Pat Cummins) या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. ब्रेट लीचे (Brett Lee) असे मत आहे की जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर तो आरामशीर होऊ शकतो परंतु तंदुरुस्त खेळाडूंनी जास्तीत जास्त सामने खेळायला हवे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने टीम इंडियाविरूद्ध वन डे मालिकेच्या अवघ्या २ सामन्यांनंतर पॅट कमिन्सला विश्रांती देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कमिन्स ऑगस्टमध्ये इंग्लंड दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता आणि IPL २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी देखील खेळला होता. अखेरच्या वनडे सामन्यासाठी त्याला विश्रांती…

Read More

नाशिक : धुळे-नंदूरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरीश पटेल (Amrish Patel) यांचा विजय झाला आहे. ४३४ मतांपैकी ३३२ मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली आहेत. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. यावरून महाविकास आघाडीत काहीही ठीकठाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आता यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरीश पटेल यांचे गुलाम आहेत, असा घणाघाती आरोप गोटे यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपावर…

Read More

मुंबई :  मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत (sanjay raut) हे नेहमी भाजपाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर टीका करतात. यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांना टोमणा मारला, आले अंगावर की ढकल भाजपावर, ही संजय राऊतांची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बहुतांश योजनांच्या विरोधात राऊत बोलतात. कोरोना काळात राज्यातील सर्व वर्गांतील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असताना राज्य मदत देण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी अनेकदा केंद्राकडे बोट दाखवले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली.  “या सरकारला स्वतःचं कोणतंही धोरण नाही. कामे करण्याची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमधील तीनही पक्षांत समन्वय नाही. एक मंत्री एक भूमिका…

Read More

मुंबई : गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच पुढील सहा महिने पुरेल इतका 125 ते 130 लाख मे. टन साखर साठा आहे. नवीन उत्पादीत केलेली साखर विक्रीसाठी मार्च २०२१ उजाडणार आहे. तेथून पुढे तयार होणारी साखर पुढील सोळा महिने विकावी लागणार आहे. पुढील २०२२चा हंगामही बंपर उत्पादन देणारा असेल, असा अंदाज आहे. त्यामुळेच साखर विक्रीचे मोठे आव्हान कारखान्यांपुढे आहे. कोरोनामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची मागणी कमी झाली. निर्यात रखडल्याने शिल्लक राहिलेली १० लाख मेट्रीक टन साखर शिल्लक राहिली. शिल्लक आणि नव्याने उत्पादन अशी एकूण १२५ लाख मेट्रीक टन साखर विक्रीचे आव्हान देशातील साखर कारखान्यांपुढे आहे. दरमहा २० लाख मे. टन साखरेची विक्री होते. या हिशोबाने…

Read More