Author: saimat team

जळगाव : गणेश पाटील सत्ता मिळूनही कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने भ्रमनिरास झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. संपर्क प्रमुखांकडे गार्‍हाणी मांडूनही काही उपयोग होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी संपर्क प्रमुखांकडे वेळ नाही परंतु एखाद्या ‘अर्थ’पूर्ण विषयात तोडगा काढण्यासाठी विमानाने तात्काळ जळगावी धाव घेऊन कुणालाही न भेटता दौरा आटोपून निघून जाणार्‍या संपर्क प्रमुखांना कुठलीच वेळेची अडचण येत नाही. नुकतेच दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुख विमानाने एक दिवसाचा दौरा आटोपून कुणाही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना न भेटताच निघून गेले. पक्षात या दौर्‍याची चर्चा जोरात सुरु आहे. काही धनाढ्य व्यक्तींचे…

Read More

एरंडोल ः प्रतिनिधी तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला आहे. किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सायंकाळी ते घरी परत आले नाही. पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. किशोर पाटील हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते.ते तळई येथील सेवानिवृत्त सचिव पुरुषोत्तम गायकवाड यांचे जावई आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी कुंझरकर यांना गौरविण्यात आले होते. त्यांची नुकतीच राज्य…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा व त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांना रक्तदानाविषयी आवाहन केले असता जळगाव जिल्हा मनियार बिरदारीने त्यास प्रतिसाद देत नशिराबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रक्तपेढीला ७१ बॅगेचे संकलन करून दिले. जळगाव येथील फिजिशियन तज्ञ डॉक्टर मंधार पंडित यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष गफ्फारभाई मलिक होते तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य पर्यवेक्षिका खैरून उन्निसा शेख, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, विनोद रंधे, चंदू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष मझर खान,उपाध्यक्ष नशिराबादचे बरकत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ व जळगाव शहर तेली समाज युवक मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त तेली समाज मंगल कार्यालयात प्रतिमा पुजन व माल्यार्पण कार्यक्रम संपन्न झाला. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे व जिल्हाध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी यांचे हस्ते प्रतिमा पुजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक महेश चौधरी, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप चौधरी, रविंद्र चौधरी, दुर्गेश चौधरी, मनोज चौधरी, प्रताप चौधरी, देवेंद्र नाना चौधरी, उदय चौधरी, सुनिल चौधरी, एकनाथ चौधरी, रमेश चौधरी, कैलास चौधरी, वासुदेव चौधरी, डॉ. अशोक चौधरी, दर्पण चौधरी, राहुल महेश चौधरी, आदर्श पाटील, जयदीप चौधरी,…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी आदर्श गाव राजवड (ता. पारोळा) येथील मुख्याध्यापिका समाजसेविका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांना ‘मानस चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद’ या संस्थेकडून ‘ग्लोबल ह्युमॅनिटीरियन अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.पाकिजा पटेल यांची शैक्षणिक सामाजिक कार्याची भरारी पाहता तसेच त्यांना नुकतीच युरोप कडून डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित केले असल्याने तसेच देशभरातून कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र मिळाल्याने त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला. उपक्रमशील शिक्षिका, शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण प्रयोग, पर्यावरण, सर्व भौतिक डिजिटल वर्ग, संस्कारक्षम शिक्षण, अ श्रेणीतील जिल्ह्यातील नामांकित शाळा, या बाबींचा समावेश असल्याने डॉ. पाकिजा पटेल यांना पुरस्कार प्राप्त झाला. स्पर्धात्मक शिक्षणावर त्यांचा…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील शासकीय निमशासकीय व नगरपंचायत मालकीच्या जागांवर तसेच खाजगी जागांवर नगरपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्यासंदर्भात नगरपंचायतकडे सूचना करूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नसल्याबाबत मुक्ताईनगर येथील नगरसेवकांतर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील शासकीय, निमशासकीय तसेच नगरपंचायत मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यासोबतच खाजगी जागांवर सुद्धा बांधकामे सुरू आहेत. परंतु त्यासंदर्भात मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेण्यात येत नाही. यासंदर्भात मुख्याधिकारी अश्‍विनी गायकवाड यांच्याकडे उपनगराध्यक्षा मनिषा प्रवीण पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी सूचनाही केल्या. परंतु त्याकडे नगरपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे येथील…

Read More

जळगाव : साईमत चमूकडून शेतकर्‍यांच्या भारत बंद हाकेला जळगाव शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम झाल्याचे दृष्य दिसले. तर शहरातील प्रमुख बाजारपेठेत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करण्यासाठी शहरात गटागटाने फेरफटकाही मारला. याशिवाय जामनेरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून अमळनेरात चक्काजाम करण्यात आला आहे. धरणगावातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. मलकापूरात नवजीवन एक्सप्रेस आंदोलकांनी काही काळ रोखली. जळगाव शहरात सकाळी प्रारंभी मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने उघडण्यात आली होती तर बरीच दुकाने बंद होती. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी गटागटाने शहरातील प्रमुख भागात फिरून बंदचे आवाहन केल्यामुळे फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत बंदचा फटका देशातील अनेक राज्यांत दिसून येत आहे. दिल्लीच्या अनेक सीमा बंद आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिहारमध्ये आणि बर्‍याच ठिकाणी बस आणि गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती.पंजाबच्या मोहालीमध्ये टोल नाका बंद होता.अमृतसरमध्ये बंदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे प्राथमिका वृत्त आहे.शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. भारत बंदमुळे दिल्लीतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टिकरी, झौदा, धनसा सीमा वाहतुकीसाठी बंद आहेत.पंजाब, हरियाणा, बिहार, पश्‍चिम बंगाल,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या घरकुलांची निर्मिती करावी, राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी असलेले हे अभियान राबवण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीस जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी,धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्यस्थिती कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या शाळांना १५ दिवसांचा ब्रेक दिला होता.त्यानंतर आता उद्या मंगळवारपासून (दि.८) नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.जिल्ह्यातील ८५६ पैकी ७६८ शाळांनी शाळा उघडण्यास ना-हरकत असल्याचे पत्र शिक्षण विभागाला दिले तर २ लाख ७ हजार ९५ विद्यार्थापैकी ५२ हजार ५२७ पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवण्याचे संमतीपत्र दिले आहे. शाळा सुरु झाल्यावर ही संख्या वाढणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिली. शाळा सुरु करण्याआधी शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनास देण्यात आले आहे. संस्थाचालक,व्यवस्थापन समितीनेही शाळा सुरु करण्यास पाठिंबा दिला आहे. यामुळे मंगळवारी शाळांची…

Read More