जामनेर ः प्रतिनिधी आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेकांनी बीएचआरच्या मालमत्ता अत्यंत कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांचे नुकसान केले. ठेवीदारांनी साथ दिल्यास व ते जामनेरात आल्यास बीएचआरच्या मालमत्ता घेणार्यांच्या घरासमोर २६ जानेवारी रोजी मोर्चा काढून घंटानाद करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ललवाणींनी गिरीश महाजन व साधना महाजन यांच्यावर आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही. आमदार गिरीश महाजनांचा जामनेर शिक्षण संस्थेच्या मालमत्तांवरही पूर्वीपासूनच डोळा आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या अधिकृत परवानगी न घेता बीओटी मार्केटमधील गाळे अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून जवळपास २०० कोटी रूपये कमवले. शेतकी संघाच्या व्यापारी गाळ्यांबाबतही हेच सुरु…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी लिहित्या हातांना ऊर्जा देण्याचे काम पुरस्कारांच्या माध्यमातून होते.वर्तमानात वाङ्मयात नवनवे विषय हाताळले जाताहेत.समाजाच्या वेदनेचा तळ शोधण्याचा प्रयत्न नवी पिढी करते आहे. वाचन, चिंतन, लेखन, मननाची प्रक्रीया साहित्यविषयक उपक्रमातून गतिमान होत आहे, असे मत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. डॉ. तेजपाल चौधरी यांनी येथे व्यक्त केले.श्री गजानन हार्ट अॅण्ड आय हॉस्पिटलच्या सहकार्याने यंदापासून साहित्यविषयक पुरस्कार सुरू करण्यात आले. मनोज बोरगावकरांच्या …नदिष्ट…ला स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी तर संदीप शिवाजीराव जगदाळेंच्या …असो आता चाड…ला स्वर्गीय गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला होता.या दोन्ही पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसन पाटील, कवी शशिकांत हिंगोणेकर, ज्येष्ठ कवी बाळकृष्ण…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहीत कक्ष जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी विरेश पाटील तर रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी चेतन अढळकर यांची नियुक्ती मनसे सरचिटणीस तथा जनहीत कक्ष अध्यक्ष अॅड. किशोर शिंदे यांनी केली. जनहीत कक्ष जळगाव जिल्हा कार्यकारी पुढीलप्रमाणे – उपजिल्हाध्यक्ष रज्जाक सैय्यद (जळगाव), अविनाश पाटील (जळगाव), राहुल काळे (मुक्ताईनगर), जळगाव महानगर अध्यक्ष संदीप मांडोळे, उप महानगरध्यक्ष इमाम पिंजारी, तालुका अध्यक्ष संदीप पाटील (जळगाव), तालुका सचिव मतीन पटेल (जळगाव), एरंडोल तालुका अध्यक्ष अॅड. वसंत पवार, रावेर तालुका अध्यक्ष सुनिल हसकर, यावल तालुका अध्यक्ष कल्पेश पवार, जळगाव तालुका उपाध्यक्ष मनोज लोहार, पाचोरा तालुकाध्यक्ष संदीप आनंदा पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे, चोपडा…
जळगाव ः प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रम राबवणार्या समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रविवार रोजी उनपदेव, मंगरुळ परिसरातील आदिवासी ऊसतोड कामगार वस्त्यांवर साड्या, पातळं, स्वेटर, दप्तर, बिस्किटचे पुडे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. सहकार्य – उपक्रमासाठी भगीरथ शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनिता मधुकर पाटील, चंद्रशेखर पिंपरकर, सुदाम निकम, आशिष पाटील, रेखा म्हात्रे, शालिनी सैंदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, पत्रकार शरद भालेराव, संस्थेचे अध्यक्ष आर.डी. कोळी, कवी गोविंद पाटील, दिपेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेंदुर्णी, ता.जामनेर ः वार्ताहर अनेक प्रकारचे दान आहेत. परंतु, त्यामध्येही श्रेष्ट आहे रक्तदान. यामुळे दातृत्वात रक्तदान श्रेष्ट असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांनी विधानसभेचे माजी उपसभापती तथा धी शेंदुर्णी एज्यु. सोसायटीचे संस्थापक कै.आचार्य गजाननराव गरूड यांच्या ३६ व्या व कै.श्रीमती प्रभावती गजाननराव गरुड यांच्या दुसर्या पुण्यतीथीनिमित्त पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिरात अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केेल याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सीतशराव काशीद, महिला संचालिका सौ उज्वलाताई काशिद, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जि.प.सदस्या सरोजिनी संजय गरूड, ज्येष्ट संचालक सागरमल जैन, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेरू काझी, यु. यु पाटील, पं.स.सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी, माजी उपसभापती सुधाकर बारी, माजी पं.स.सदस्य…
फैजपूर : प्रतिनिधी अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी भारत भूमितील सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाचा तन-मन-धनाने सहभाग असावा व या मंदिरासाठी माझेही योगदान आहे, अशी प्रत्येकाच्या मनात आंतरिक भावना उत्पन्न व्हावी, या प्रमुख उद्देशाने श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्या यांनी देशात विभागवार समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देवगिरी प्रांत भुसावल जिल्ह्याचे मुख्य कार्यालय भुसावळ येथे स्थापन करण्यात येऊन त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी झालेल्या बैठकीत समिती गठीत करून सर्वानुमते परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची देवगिरी प्रांत भुसावल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यालय व स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहे. दि.१५ जानेवारी २०२१…
जळगाव ः प्रतिनिधी परिवर्तन उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करून सांस्कृतिक क्षेत्रात जळगावचा नावलौकिक वाढवत आहे. भाऊंच्या उद्यानातील अॅम्पी थिएटरचा उद्देश परिवर्तनने पूर्ण केला असल्याचे मत भावांजली महोत्सवाच्या समारोपात जैन उद्योग समूहाचे संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा समारोप रविवारी संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्या ‘हंस अकेला’ने झाला.त्यात दर्शना पवार लिखित ‘बहिणाबाई’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.दीपक बारी यांनी भंवरलाल भाऊंवर लिहिलेली इंग्रजी कवितेची फ्रेम अतुल जैन यांना भेट देण्यात आली. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, डॉ. अमोल सेठ, यजुर्वेद महाजन, रंगकर्मी जगदीश नेवे उपस्थित होते. ‘माटी कहे कुम्हार…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय जमिनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका अध्यादेशाद्वारे तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात त्वरीत करण्यात यावी, असे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी अध्यादेशात म्हटले आहे. शासनाने भाडेपट्ट्याने अथवा कब्जे हक्काने प्रदान केलेल्या भोगवटदार वर्ग-२ शासकीय जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याच्या कारवाईस राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र जमिन महसुल नियम २०१९ संदर्भाधिन अधिसुचनेद्वारे हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सदर स्थगिती आदेशाचा अंमल तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती येथील एन.रामाराव गृहनिर्माण संस्थेचे सचिव डी.एम. अडकमोल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
जळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करा आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे गेल्या अठरा दिवसापासून सुरु असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भारतभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध सामाजिक तसेच शेतकरी संघटनातर्फे धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय आंदोलनास प्रतिसाद देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह केला जात आहे.या आंदोलनात शेतकरी, कामगार तसेच बुद्धीजीवी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, नियाजअली…
अमळनेर ः प्रतिनिधी ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त असल्याचे मत आ.अनिल पाटील यांनी अक्कलकोट संस्थानला दिलेल्या भेटप्रसंगी व्यक्त केले. यावेळी बोलतांना आ.पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे मार्गदर्शन बहुमोल असल्यानेच न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौफेर प्रगती साधत आहे. ज्या-ज्या वेळी तीर्थक्षेत्र अक्कलकोटला येतो त्या-त्या वेळी अन्नछत्र मंडळास आवर्जून भेट देतोच, असे म्हणताना ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याचे मनोगत आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते श्री क्षेत्र अक्कलकोट तेथे सहकुटुंब श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे…