मुंबई : प्रतिनिधी सरोचह न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा मुद्दा चांगलाच पेटला आहे . या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही ते भेट घेणार आहेत. गुरुवारी संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. मराठा समाज सध्या आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. मराठा समाजाच्या मनात असलेला असंतोष व्यक्त करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसाचा फटका अनेक गावांना बसला. यात अंतुर्ली मंडळातील उचंदा, शेमळदेसह अनेक गावातील परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधून दिली तसेच याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचीही मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. झालेल्या नुकसानीची शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…
मुंबई : प्रतिनिधी महिन्याभराच्या आजारपणानंतर शरद पवारांची कामाला सुरुवात केली आहे. आजारपणानंतर ते आता ॲक्शन मोडवर आले आहेत. तसेच १ जूनपासून ते प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार आहेत. १ जून रोजी शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार आहेत. यामुळे आता त्यांनी पुन्हा बैठकांच्या फैरी सुरू केल्या असल्याचं बोललं जात आहे. १ जून रोजी शरद पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून कामाचा आढावा घेणार असून, राजकीय परिस्थितीवर चर्चाही करणार आहेत. इतकंच नाहीतर शरद पवार हे राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत काय सूचना देतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असून यानंतर…
केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात (Farmers Agriculture Act)सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल २६ मे रोजी(26 may) सहा महिने झालेत. यानिमित्त शेतकऱ्यांनी ‘काळा दिवस’ पळून काल दिल्लीत मोठे आंदोलन केले. याबाबत सामनातून शिवसेनेने(Shivsena) केंद्रातील मोदी सरकारवर(Modi Govt) टीका केली. केंद्राने आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला. या संदर्भात, इंग्रजांच्या काळात १९०७ च्या २६ मे रोजी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा हवाला दिला आणि सरकारने यावर तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन पुन्हा भडकेल, असा इशारा दिला. अग्रलेखात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी बुधवारी ‘काळा दिवस’(Black Day) पाळला. आणि या कायद्यांविरोधातील आपली जिद्द व ताकद जराही कमी झालेली नाही हेच दाखवून…
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अखेर पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे ( Anna Bansode) यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरीतील पावसमधून सिद्धार्थ बनसोडे(Siddharth Bansode) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तानाजी पवार (Tanaji Pawar) यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या विलंबामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट…
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही मुंबईसारख्या महानगरात मात्र दिवसागणिक रुग्णसंख्या कमी होत आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळं संसर्ग कमी झाल्याचं बोललं जात आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा महापालिकेच्या या कामाचं कौतुक केलं आहे. ((Bombay High Court Praises BMC For its work against Coronavirus) राज्यातील करोनाची स्थिती व त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात करण्यात आलेल्या विविध जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं बीएमसीच्या करोनाच्या संदर्भातील कामाचा गौरव केला. ‘मुंबई महापालिकेकडून करोनाविषयक सर्व नियोजन चांगल्या पद्धतीनं होत आहे. मुंबई महापालिकेच्या मॉडेलचे इतर महापालिकांनीही अनुकरण करावं आणि त्याविषयी मुंबई महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन राज्यातील इतर महापालिका आयुक्तांसोबत व्हीसीद्वारे बैठक घ्यावी,…
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे (BJP) खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली. तसेच ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती संभाजी राजेंनी माध्यमांना दिली. मात्र या भेटीतून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या १० मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा प्रश्नही विनायक मेटे यांनी उपस्थित केला.…
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (AICTE) ने महाविद्यालयांना आठ भाषांमध्ये अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग)चे शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, तेलुगू, तमीळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या आठ स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तसंच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत इंग्रजीच्या भीतीने अनेक हुशार विद्यार्थी अभियांत्रिकीपासून दूर राहिले आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन व अन्य देशांमध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण त्यांच्या स्थानिक शिक्षण दिले जाते, हे उल्लेखनीय. अभातंपचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण घेता आले तर त्यांचा पाया मजबूत व्हायला मदत होईल. आम्हाला पूर्ण देशामधून एकूण…
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) २०१५ मध्ये म्हणाले की, माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव (Petrol prize hike) कमी झाले असते, तर चांगले झाले असते. परंतु, २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मात्र, आता हे नशीब कोणाचे आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. जगात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगावे, अशी मागणी नवाब मलिकांनी यापूर्वी केली होती. मात्र, मोदींनी या प्रश्नाचे उत्तर न देता उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहे. याच दरवाढीवरून मलिकांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची…
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 13 तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी…