Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»आशिया चषक ः सचिन-गिलचे शतक अन्‌‍‍ भलताच योगायोग
    क्रीडा

    आशिया चषक ः सचिन-गिलचे शतक अन्‌‍‍ भलताच योगायोग

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोलंबो ः वृत्तसंस्था

    आशिया चषकात बांगलादेशने भारताचा अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव केला.शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला.त्याआधी सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी साकारली पण ही खेळी व्यर्थ ठरली.
    सलामीला आलेल्या गिलनं १३३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १२१ धावांची खेळी साकारली. त्याने अनेक महत्त्वाच्या भागिदाऱ्या रचल्या.गिल ४४ व्या षटकात बाद झाला.त्यानंतर अक्षरने किल्ला लढवला पण तो बाद झाल्यानंतर बांगलादेशचा विजय निश्चित झाला. भारताला अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे गिलची शतकी खेळी वाया गेली.त्यामुळे ११ वर्षांनंतर एक अजब योगायोग पाहायला मिळाला.
    आशिया कपमध्ये भारताचा पराभव आणि त्यात शतक असा योगायोग केवळ दुसऱ्यांदा जुळून आला आहे. याआधी असा योगायोग सचिन तेंडुलकरसोबत घडला आहे. विशेष म्हणजे त्यावेळीही समोर बांगलादेशचा संघ होता. २०१२ मध्ये झालेल्या आशिया चषकात सचिननं १४७ चेंडूंमध्ये ११४ धावांची खेळी केली होती. त्यात त्यानं १२ चौकार आणि १ षटकार ठोकला होता. हा सामना मिरपूरमध्ये खेळवला गेला होता.त्यात बांगलादेशने ४ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला.बांगलादेशने आशिया चषकात केवळ दोनदाच भारताचा १पराभव केला आहे.२०१२ मध्ये भारताला बांगलादेशविरुद्ध पहिला पराभव पाहावा लागला.त्यानंतर आता ११ वर्षांनंतर बांगलादेशने भारताला पराभूत केले आहे. या दोन्ही सामन्यांत भारतीय संघातील एका फलंदाजाने शतक साकारले.२०१२ मध्ये सचिन आणि आता गिलने शतकी खेळी उभारली पण या दोन्ही सामन्यांत भारताचा पराभव झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.