साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याअंतर्गत ५१ हजारांहून अधिक तरुणांना जॉईिंनग लेटर दिले. याव्ोळी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरिंन्सगद्वारे तरुणांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, भारत लवकरच टॉप-३ अर्थव्यवस्थेत सामील होईल. देशाचे रक्षक बनणे हे देशातील प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे.
९ महिन्यांत ४.८४ लाख बेरोजगारांना नियुक्ती
२२ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पीएम म्हणाले होते – २०२३ च्या अखेरीस देशातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी गेल्या ९ महिन्यांत ७ रोजगार मेळ्यांमध्ये ४ लाख ४८ हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले आहे.
अर्थव्यवस्थेचे चक्र हाताळणे, सुरक्षा प्रदान करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक देश आहे. मोबाइल फोनची मागणी वाढली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा मोबाइल प्रमाणेच मेड इन इंडिया लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्स जागतिक बाजारात विकले जातील. केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो तिबेटीयन सीमा पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोसह, दिल्ली पोलिसांमध्येही भरती करण्यात आली आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी सातव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ७० हजारांहून अधिक तरुणांना जॉइिंनग लेटर दिले होते. देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये ४४ ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते. पीएम मोदी व्हिडिओ कॉन्फरिंन्सगद्वारे या कार्यक्रमाशी जोडले गेले.
पीएम मोदींनी नोकरी शोधणाऱ्यांना सांगितले की, १९४७ च्या या दिवशी (२२ जुलै) संविधान सभेने तिरंग्याच्या डिझाइनला अंतिम रूप दिले. आज तुम्हाला नोकरी मिळाली ही प्रेरणादायी गोष्ट आहे. सरकारी नोकरीत असताना तिरंग्याच्या वैभवाला बाधा पोहोचू नये यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत.