तीन दिवसानंतर मृत्यूशी झुंज देत प्राणज्योत मालवली
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सविताबाई संजीव शिरसाठ यांचा ५ ऑक्टोबर रोजी रात्री १०:२५ वाजता अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचे वृत्त गावभर पसरताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सविताबाई शिरसाठ ह्या सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जायला निघाल्या होत्या. तेव्हा नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्या अंतरावरील जत्रा हॉटेल जवळील हायवे रस्त्यावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली. नाका, तोंड, कानातून अति रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ लोकमान्य हाॅस्पीटलला उपचारार्थ दाखल केले होते. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या पत्रकार महेश शिरसाठ आणि कैलास शिरसाठ यांच्या भावजयी आहे. त्यांच्या पश्चात इंजि.पवन, इंजि.अनुष्का अशी दोन मुले आहेत.