कविवर्य महानोरांच्या गीतांवर आज ‌‘हिरवाई अन्‌‍‍ निळाई जगलेले‌’ विशेष कार्यक्रम

0
14

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री ना.धों. महानोर  यांच्या गीतांवर आधारित “हिरवाई अन्‌‍‍ निळाई जगलेले..” या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात दि. २७ ऑगस्ट  रोजी संध्याकाळी  ७ वाजता करण्यात आलेले आहे.

महानोर हे गीतकार असलेल्या जैत रे जैत या चित्रपटातील सुमधुर गीतांचं गारुड आजही मराठी मनावर अधिराज्य करीत आहे. अशा या रानकवींना त्यांनी रचलेल्या कविता व अजरामर गीते गाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  निसर्गाशी एकरूप झालेल्या या महाकवींच्या हृद्य आठवणी व गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, व दीपक चांदोरकर हे गायक असून सुसंवादीनी म्हणून पूर्वाश्रमीच्या जळगावच्या व सद्यस्थितीत पुणे येथे स्थायिक असलेल्या आकाशवाणीच्या निवृत्त जेष्ठ  उद्घोषीका डॉ. प्रतिमा विश्वास या करणार आहेत. तरी रसिकांनी या कृतज्ञता सोहळ्यास आपली उपस्थिती द्यावी असे नम्र आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन च्या वतीने करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here