कौटुंबिक विवंचनेतून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

0
50

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील मेहरूण परिसरातील रेणूका नगर मधील ४२ वर्षीय इसमाने कौटुंबिक विवंचनेतून छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मेहरूण परिसरातील रेणुका नगरात संतोष वामन भावसार (वय ४२) राहिवासाला होते. त्यांची पत्नी तीन महिन्यांपासून – तीन मुलांसहित बेपत्ता आहे. तेव्हापासून ते रेणुका नगरात एकटे राहत होते. प्लम्बिंग काम करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या विवाहित बहिणी रेणुकानगर परिसरातच राहतात. गेल्या काही दिवसांपासून संतोष हे कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. याबाबत नागरिकांना संशय आला. त्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांच्या घरात जाऊन पाहिले असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबतची माहिती त्यांच्या बहिणींना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here