Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मलकापूर»नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा सापडला अतिक्रमणाच्या विळख्यात
    मलकापूर

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा सापडला अतिक्रमणाच्या विळख्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रहार जनशक्तीतर्फे आंदोलनाचा इशारा

    साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

    ‘तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा’ चा नारा देणाऱ्या देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असतांनाही न.प. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला हा पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत न.प. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास लवकरच न.प. कार्यालयासमोर बाभळीच्या काट्यांवर बसून उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

    स्थानिक तहसील चौक परिसरात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आलेले आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पुतळ्याच्या व स्मारकाच्या भिंतीलगत मुक्ताईनगर रोड, आठवडी बाजार रोड, परिसराच्या समोर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटून त्याठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नेताजींचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून पुतळा परिसराचे वैभव झाकल्या जात आहे.

    न.प. प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष

    यासंदर्भात अनेकदा न.प. प्रशासनाकडे तोंडी माहिती देऊन पुतळा व स्मारक परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी करण्यात आली. परंतु याकडे कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या न.प. प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तेव्हा तातडीने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ झालेले अतिक्रमण न काढल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने न.प. कार्यालयासमोरच बाभळीच्या काट्यावर बसून उपोषण करावे लागेल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026

    Malkapur:सावित्रीबाई फुले यांचे विचार कृतीत उतरवा : प्रा.शारदा खर्चे

    January 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.