पहिल्यांदा विरोधी पक्षांना विश्वासात न घेता संसदेचे विशेष अधिवेशन

0
16

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा विरोधी पक्षांना अधिवेशनाचा विषय,अजेंडा काहीही सांगण्यात आलेले नाही. देशाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर ‘इंडिया’मधले पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात. मात्र या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.
संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे अधिवेशन चालणार आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन असणार आहे. राज्यसभेनेही खासदारांना सूचित केले आहे की १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे तेव्हा सर्व खासदारांनी त्यासाठी उपस्थित रहावे. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत हे कामकाज चालेल त्यानंतर दुपारी २ ते ६ या वेळात पुढचे कामकाज चालेल असेही नमूद करण्यात आले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा काय? हे अद्याप समोर आलेले नाही.
या विशेष अधिवेशनाच्या आधी ९ आणि १० सप्टेंबरला जी २० शिखर परिषद पार पडते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिवेशन नव्या संसदेत घेतले जाणार आहे. अर्थसंकल्पयी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे अधिवेशनाचे तीन प्रकार आहे. विशेष अधिवेशन तेव्हाच बोलावले जाते जेव्हा एखादी विशेष घटना असते. आता यावेळी सरकारच्या वतीने सांगण्यात आलेले अधिवेशन कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here