Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»Ramdas Athawale’s : महायुतीला धक्का! रामदास आठवलेंचा स्वबळाचा नारा
    मुंबई

    Ramdas Athawale’s : महायुतीला धक्का! रामदास आठवलेंचा स्वबळाचा नारा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ३९ उमेदवारांची यादी जाहीर

    साईमत/मुंबई/प्रतिनिधी : 

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ओढाताणीनंतर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आठवले यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून ३९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

    जागावाटपाच्या चर्चेत रिपाईला सात जागा देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाही महायुतीने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये रिपाईच्या एकाही उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातून जागा देण्याचे निर्देश दिले होते, तरीही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल न झाल्याने रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमच्याशी विश्वासघात झाला असून, आता स्वबळाशिवाय पर्याय नाही,” अशा स्पष्ट शब्दांत आठवले यांनी आपली भूमिका मांडली.

    मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी मतदारांची संख्या निर्णायक आहे. आतापर्यंत हा मतदार रामदास आठवले यांच्या आवाहनामुळे महायुतीच्या पाठीशी उभा राहत होता. मात्र, आता रिपाईने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत १०० ते २०० मतांचा फरकही उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकतो. अशा स्थितीत रिपाईच्या या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

    रामदास आठवले यांनी जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत मुंबईच्या विविध भागांतील महत्त्वाच्या वॉर्डांचा समावेश आहे. रिपाईच्या या अनपेक्षित निर्णयामुळे महायुतीच्या गोटात खळबळ माजली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष दुरावणे महायुतीला परवडणारे नाही. आता भाजपचे वरिष्ठ नेते रामदास आठवले यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की रिपाई आपल्या निर्णयावर ठाम राहून महायुतीला निवडणुकीत ‘रिटर्न गिफ्ट’ देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Shinde Knelt Down : शिंदेंनी गुडघे टेकले, लाचार माणसाचे दर्शन घडवले

    December 30, 2025

    Jalgaon : तिकीट नाकारल्याने भावनिक क्षण; कुटुंबाला रडू कोसळले, आमदार हतबल

    December 30, 2025

    Gangster Bandu Andekar’s House : अजित पवारांच्या पक्षाने कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरात दिली २ तिकीटं; नव्या वादाला तोंड फुटणार?

    December 30, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.