यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय युवकाची आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र प्रभाकर जावळे (वय ३१, रा. भालोद ता. यावल) असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही.
दरम्यान भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने विहिरीजवळ अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठाजवळ ठेवली होती. शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी गावातील काही नागरीकांना अंगावरील कपडे आणि चप्पल आढळून आल्याने हा आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रविंद याला दुर्धर आजार जाडला होता. या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले.