साईमत प्रतिनिधी
नवी दिल्ली – राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि. २०) केला. राऊत म्हणाले की, हे मंत्र्ये भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद वर्तन करत होते. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी या प्रकरणाची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या “एपस्टिन फाइल्स” प्रकरणाशी केली. त्यांनी म्हटले,
“जगात एपस्टिन फाइल्स आणि महाराष्ट्रात खरात फाइल्स.”
राऊतांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीसांनी अत्यंत गुप्तपणे गेल्या १५ दिवसांपासून गृहखात्याच्या माध्यमातून खरात फाइल्स संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांची पथके हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी काम करत असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्रींच्या या पावल्याचे कौतुक केले आणि म्हटले की,
“मुख्यमंत्री यांनी प्रकरणाची साफसफाई सुरू केली असल्यास, ते प्रशंसनीय आहे.”
संजय राऊत यांनी पुढे खुलासा केला की, अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचा गुरूमहाराज आहे. खरात प्रकरणामुळे मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत आणि काहींना ICU मध्ये भरती करावे लागले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, महिला आयोगाच्या अध्यक्षांचे राजीनामे घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेना खासदारांनी असेही दावा केले की, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यकाळात शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या अशोक खरात बाबांच्या शिफारशीने होत होत्या. राऊत म्हणाले की, यासाठी खरात अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंट येथे मुक्कामी असायचा.
संजय राऊत यांच्या आरोपांनी राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, मंत्रिमंडळातील मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्यात तणाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
