Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब, वापर होतोय
    मुंबई

    लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब, वापर होतोय

    saimat teamBy saimat teamOctober 31, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब, वापर होतोय
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । “मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही. ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय.”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला.

    तसेच, “कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच होते ना… मेरीटनेच सगळे होणार आणि आघाडी सरकार कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचं सरकार निष्पक्षपातीपणाने काम करतंय…जी कागदपत्रे पुढे येत आहेत ती धक्कादायक आहे. हे धक्कादायक असल्यानेच एनसीबीने दिल्लीहून चौकशी समितीने त्यांची चौकशी केली. त्यामुळे त्यांचे दाखले हा विषय नसला तरी त्यापेक्षा खंडणीचा जो प्रकार आहे, हा अगोदर कधी प्रकार कधी घडला नाही आताच्या राजवटीत मात्र ते सुरु आहे.” असेही जयंत पाटील म्हणाले.

    “जिल्हा परिषदेत आघाडी जर झाली तर आघाडीची चर्चा करण्याअगोदरच स्वबळाची भाषा बोलणं म्हणजे थोडंसं आघाडी करायचीच नाही अशा भावनेतून बोलण्यासारखं होतं, तशी आमची भावना नाही. आघाडीला आमचं प्राधान्य आहे. स्वबळाचा नारा आज द्यायची गरज नाही. सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सामंजस्याने, चांगल्या पद्धतीने या जिल्हा परिषदेत काम करतील.” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.