Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘Marathi Identity’ : राज्याचे वैभव असलेले ‘मराठीपण’ जपले पाहिजे
    जळगाव

    ‘Marathi Identity’ : राज्याचे वैभव असलेले ‘मराठीपण’ जपले पाहिजे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    “मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठीचा केवळ अभिजात भाषा म्हणून ढोल न वाजवता असे मराठीपण महाराष्ट्राचे वैभव आहे. ते आपण जपले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले. आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन व नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

    त्यांनी दिवाळीनिमित्त ‘दाद आणि टिळक’ या कविता प्रारंभी सादर केल्या. महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी माय आणि नोकरी व कौटुंबिक अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांविषयी सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘मुळाक्षरांची कविता’ आणि ‘उजवे डावे’ ही कविता सादर करत कार्यक्रमाचा समारोप केला. वर्तमान परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत काही शाब्दिक कोट्या व विनोदाद्वारे श्रोत्यांना त्यांनी विचार मंथन करायला लावले.

    यांची लाभली उपस्थिती

    व्यासपीठावर डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. भरत बोरोले, सी. ए. अनिलकुमार शाह, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. दिनेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमास माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. राजूमामा भोळे, नंदकुमार बेंडाळे, हरीश मिलवाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. शशिकांत गाजरे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अविनाश भोसले तर सूत्रसंचालन तथा आभार डॉ. अपर्णा भट-कासार यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध गांजाची साठवणूक करणाऱ्याला संशयिताला अटक

    December 29, 2025

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Jalgaon:रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच…! नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.