Chain Hunger Strike : महावितरणच्या अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ, इतर कर्मचाऱ्यांचा साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा

0
5

प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ आक्रमक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला आहे. ते न्याय मिळेपर्यंत कायम उपोषणाला बसणार आहेत.

मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

उपोषणाला कामगार महासंघाचा पाठिंबा अन्‌ सहभाग

कामगारांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे कामगार महासंघाने म्हटले आहे. मंगळवारी वरिष्ठ तंत्रज्ञ विकी पाटील, तंत्रज्ञ सुदर्शन सपकाळे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला महासंघाने साखळी उपोषणद्वारे पाठिंबा दिला असून ते सहभागी झाले आहेत. संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्यावतीने आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा महासंघाच्यावतीने इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here