Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»बेशिस्त वाहनचालकांकडून साडेसहा लाखाचा दंड वसूल
    नाशिक

    बेशिस्त वाहनचालकांकडून साडेसहा लाखाचा दंड वसूल

    saimatBy saimatSeptember 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे बसणार चाप

    साईमत।मालेगाव।प्रतिनिधी।

    शहरात विनाहेल्मेट, विना लायसन्स, फोनवर बोलणे, विना सिटबेल्ट, अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक शाखेने १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईपैकी १६९ वाहनांकडून दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेला ६ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड जमा झाला आहे. शहरात बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

    येथे मनमर्जीने वाहने चालविणाऱ्यांवर ई-मशिनद्वारे ऑनलाईन दंड दिला जातो. ५०० रुपयांपासून ते २ हजारापर्यंत दंड ठोठावला जातो. येथे दुचाकी, चारचाकी, तीनचाकी रिक्षा, अवजड वाहने, अवैध पार्किंग, विनाहेल्मेट, मोबाईलवर बोलणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे असे प्रकार सर्रासपणे घडतात. यामुळे अपघात होतात. अशा वाहनचालकांवर येथील वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

    त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६९ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. नागरीक स्वत:हून वाहतूक शाखेस व वाहतूक पोलिसांकडे ऑनलाईन व रोख स्वरुपात दंड भरत आहेत. त्यामुळे येथे ९ महिन्यात ६ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा दंड जमा झाला आहे.

    अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेचा ताण

    वाहतूक शाखेकडे अपूर्ण कर्मचाऱ्यांवर शहराचा अतिरिक्त भार येत आहे. येथील मोसम पूल चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच सटाणा नाका, सोमवार बाजार, नवीन बसस्थानक, दरेगाव नाका, मनमाड चौफुलीसह अनेक भागात वाहतूक पोलिसांची गरज आहे. येथील वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याने आहे त्याच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    SaiBaba Mandir donations : “फक्त ९ दिवसांत साईबाबा संस्थानला २३ कोटींच्या देणगीचा नवा विक्रम!”

    January 3, 2026

    Death Of The Bride : विवाह मुहूर्तालाच जीवनाची अखेर ; नववधूचा धक्कादायक मृत्यू

    December 29, 2025

    Nashik Municipal Corporation : नाशिक मनपात परिवर्तन घडविणार : आदित्य ठाकरेंचा निर्धार

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.