Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला पण आताच्या चोरांपुढे तो मांडणार नाही
    जळगाव

    माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला पण आताच्या चोरांपुढे तो मांडणार नाही

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील त्यामुळे तो मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवारी) जळगाव येथील सभेत केला .
    प्रकाश आंबेडकर यांची गाडगेबाबा चौकात जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन.
    प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा मुद्दा यशस्वीपणे हाताळला. पण त्यानंतरही तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. त्यांना या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका असे आदेश देण्यात आले. असे का? गिरीश महाजन यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
    यावेळी त्यांनी विधिमंडळ अधिवेशनावर निशाणा साधताना हा लोकशाहीतील तमाशा असल्याचा आरोप केला. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याचे वाटत नाही. तिथे सत्ताधारी कोण अन्‌‍‍ विरोधक कोण हेच समजत नाही. असा लोकशाहीचा तमाशा तिथे सुरू आहे. राज्यापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. पीकविम्याच्या मुद्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
    प्रकाश आंबेडकर यांनी मोदी देशासाठी धोकादायक असल्याचाही आरोप केला. व्यक्ती म्हणून विचार केला तर नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक आहेत. मोहन भागवत व नरेंद्र मोदी वर्षभरात एकमेकांना किती वेळा भेटले हे भागवत यांनी स्पष्ट करावे. मोदी आरएसएसच्या जोरावर प्रथम मुख्यमंत्री व पंतप्रधान झाले. पण आता ते याच संघटनेचे तीनतेरा वाजवण्याचे काम करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon Police : जळगाव पोलीस दलाची कारवाई; १९ गुन्ह्यांमधील ७१० किलो गांजा नष्ट

    December 24, 2025

    Jalgaon : अल्पवयीन मुलीचे अपहरण

    December 24, 2025

    Jalgaon : जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.