Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»शिंदाडला प्रवेशद्वाराच्या बांधकामाला समाजकंटकांचा विरोध
    पाचोरा

    शिंदाडला प्रवेशद्वाराच्या बांधकामाला समाजकंटकांचा विरोध

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    तालुक्यातील शिंदाड गावातील गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार (कमान) बांधकामासंदर्भात प्रलंबित विषयावर अनेकवेळा संघटना आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देवून दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे शासन निर्णय पुढे करत टाळाटाळ आणि काही समाजकंटकांनी कमानीला विरोध केल्यामुळे समता सैनिक दलासह ग्रामस्थांतर्फे निवेदनाद्वारे निषेध नोंदविला आहे. अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी, शिंदाड ग्रामपंचायत आदींनाही रवाना केल्या आहेत.

    ज्या ठिकाणी महामानवांचा सन्मान होत नसेल अशा ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, आमचे पुनर्वसन न झाल्यास प्रशासकीय दालनात संसार मांडू, त्यामुळे निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, अशी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. निवेदन देतेवेळी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, तालुका प्रचारक शांताराम सपकाळे, शिंदाड येथील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ता संतोष तांबे, विजय तांबे, दशरथ तांबे, देवानंद सांबळे, अनिल तांबे, अंकुश तांबे आदी उपस्थित होते.

    निवेदनाचा १५ दिवसांच्या आत गांर्भीयपूर्वक विचार करुन व कमानीचे बांधकाम अजून रखडल्यास तीव्र जनआंदोलन लोकशाही मार्गाने उभे करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत, पंचायत समिती व या प्रकरणांशी निगडीत जबाबदार अधिकारी राहतील. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गाव सोडण्याची आणि  पुनर्वसन होण्याची मुभेची मागणी केली आहे. ही घटना निषेधार्थ असून सामाजिक भावना दुखावणारी आहे. तीव्र मानसिक वेदना देणारी आहे. ज्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होत नसेल आणि त्यांच्या कमानीला जर जातीय हिनतेच्या नजरेतून बघितले जात असेल तर हे सामाजिक सन्मानांसाठी योग्य नाही म्हणून येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Lohara, Taluka Pachora: डॉ. अर्जुनभोई यांना आंतरराष्ट्रीय मानांकन

    December 29, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.